"जाहिरातीत माझ्या जागी विद्या बालनला रिप्लेस केलं", ऐश्वर्या नारकर म्हणाल्या- "शेवटच्या क्षणी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 12:05 IST
1 / 10ऐश्वर्या नारकर या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अभिनय आणि सौंदर्याने त्यांनी ९०चं दशक गाजवलं. 2 / 10९०च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी त्या एक आहेत. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या ऐश्वर्या यांना रिजेक्शनचा सामनाही करावा लागला होता. 3 / 10रातोरात त्यांना एका जाहिरातीत रिप्लेस केलं गेलं होतं. अखेरच्या क्षणी त्यांना काढून विद्या बालनला घेतलं गेलं होतं. 4 / 10आरपार या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या यांनी हा किस्सा सांगतिला. त्या म्हणाल्या, 'मी नेहमी कम्फर्ट झोनमध्ये राहूनच काम केलं. त्यामुळे फार रिजेक्शनचा प्रश्न आला नाही'. 5 / 10'माझ्याकडे काम आलं आणि मी ते करत गेले. पण, मी स्वत:हून फारशी कुणाकडे काम मागायला गेले नाही'.6 / 10'पण, जाहिरातीबाबत तसं झालं होतं. मला आठवतंय की एका जाहिरातीसाठी मी ऑडिशन दिली होती'. 7 / 10'विद्या बालन आणि मी तेव्हा शॉर्ट लिस्ट झालो होतो. बाहेर जाऊन कुठेतरी ती जाहिरात त्यांना शूट करायची होती'. 8 / 10'क्लाइंटला हवं म्हणून त्यांनी विमानाची तिकीटं वगैरे बूक केली होती. माझ्या हातात तिकिटं होती पण, त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही होल्डवर आहात'. 9 / 10'आणि मग आदल्या दिवशी रात्री फोन आला की तुमचं नाही तिचं सिलेक्शन झालं. तेव्हा मग ते मनाला खूप लागलं होतं'. 10 / 10'त्यानंतर मग मी जाहिराती नाही करायचं असं ठरवलं. तुम्ही आधी सांगा की तुमचं सिलेक्शन झालेलं नाही ते चालेल. पण, गृहित धरलेलं मला आवडत नाही'.