Join us

ओढ मध्ये उल्का-गणेशची जमली जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 16:22 IST

छोट्या पडद्यावरील ‘झांसी की रानी’ या मालिकेत मनु म्हणजेच बालवयातील राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री उल्का गुप्ता अल्पावधीतच रसिकांचं ...

छोट्या पडद्यावरील ‘झांसी की रानी’ या मालिकेत मनु म्हणजेच बालवयातील राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री उल्का गुप्ता अल्पावधीतच रसिकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाली. या मालिकेच्या यशानंतर बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये दिसलेली उल्का ‘ओढ’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीकडे वळली आहे. पहिल्याच मराठी चित्रपटात तिची जोडी गणेश तोवर या नवोदित अभिनेत्यासोबत जमली आहे. या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना एक नवी कोरी जोडी पाहायला मिळणार आहे.एस. आर. तोवर यांची निर्मिती आणि सोनाली एन्टरटेन्मेंट हाऊसची प्रस्तुती असलेल्या ‘ओढ’चे दिग्दर्शन नागेश दरक व  एस. आर. तोवर यांनी केलं आहे. नवी जोडी असणं ही कथानकाची गरज असल्याने उल्का आणि गणेश यांची मुख्य भूमिकेसाठी करण्यात आल्याचं नागेश यांचे म्हणणे आहे. कॅमेरा फेस करण्याचा अनुभव उल्कासाठी नवा नाही, पण पहिलाच चित्रपट असूनही गणेशनेही प्रचंड आत्मविश्वासाने आपलं काम केलं आहे. या चित्रपटात मैत्रीची गोष्ट पाहायला मिळणार असल्याचे सांगत उल्का म्हणाली की, ‘ओढ’ चं कथानक खूपच वेगळं आहे. ही प्रेम कथा नसून मैत्रीवर आधारित गोष्ट आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अशा प्रकारची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने खूप आनंदी आहे. या चित्रपटात माझा सहकलाकार असलेल्या गणेशचा जरी हा पहिलाच सिनेमा असला, तरी त्याच्या वागण्या-बोलण्यात तसंच अभिनयात कुठेही नवखेपणा जाणवत नव्हता. त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना कुठेही अडथळा आला नसल्याचे उल्का मानते, तर पहिल्याच चित्रपटात उल्कासारख्या प्रतिभावान अभिनेत्रीसोबत काम करताना अभिनयातील बारकावे समजून घेणं सोपं गेल्याचं गणेशचं म्हणणं आहे. ALSO READ :  अखेर मुहुर्त मिळाला 19 जानेवारीला 'ओढ' सिनेमा रसिकांच्या भेटीलाअभिनयाचा अनुभव असूनही उल्काने कधीच बॉसगिरी करण्याचा प्रयत्न केला नाही. याउलट एखाद्या जीवलग मित्राप्रमाणे समजावून सांगण्यावर तिचा भर असायचा हे सांगायलाही गणेश विसरला नाही. एकूणच या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. या जोडीला मोहन जोशी, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, शशिकांत केरकर, जयवंत भालेकर, राहुल चिटनाळे, आदित्य आळणे, सचिन चौबे, शीतल गायकवाड, तेजस्विनी खताळ, मृणाल कुलकर्णी आदि मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांची साथ लाभली आहे. दिनेशसिंग ठाकूर यांनी या चित्रपटाची कथा व पटकथा लिहिली असून, त्यांनीच गणेश कदम आणि दर्शन सराग यांच्यासोबत संवादलेखन केलं आहे. छायांकन रविकांत रेड्डी यांनी केलं आहे.  वेशभूषा सुनिता घोरावत तर रंगभूषा प्रदीप दादा, बंधु धुळप यांची आहे. कलादिग्दर्शक आरिफ खान आहेत. १९ जानेवारीला ‘ओढ’ प्रदर्शित होणार आहे.