Sayali Sanjeev: सायली संजीव (Sayli Sanjeev) ही मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. झी मराठी वाहिनीवरील काहे दिया परदेस या मालिकेतून तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली. या मालिकेत तिने साकारलेली गौरी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मराठी मालिकांसह अभिनेत्रीने चित्रपटांमधूनही काम करत आपल्या अभिनयाच्या ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे. सध्या सायली संजीव समसारा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचनिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने वेगवेगळ्या विषयांवर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.
नुकतीच सायली संजीवने 'सुमन म्युझिक मराठी'च्या आम्ही असं ऐकलंय या पॉडकास्टला हजेरी लावली. त्यावेळी अभिनेत्रीने चाहत्यांचा एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. त्यादरम्यान सायली म्हणाली, "माझा ई-मेल आयडी आहे, जो इन्स्टाग्रामच्या फॅनपेजवर आहे. ज्याच्यावर आपल्याला कामचे ई-मेल्स येतात. अनेक लोकांकडे आपले नंबर नसतात शिवाय आपण पर्सनल नंबर कोणाला देऊ शकत नाही. त्यामुळे कामानिमित्त त्या माध्यमातून आपल्याकडे संपर्क केला जातो. तर आता त्यावर दिवसांतून एकदा किंवा दोन दिवसांमधून 'लग्न करशील का?' असा एक मॅसेज असतोच असतो.
त्यानंतर अभिनेत्री म्हणाली, "माझ्याकडे त्या ई-मेलचा अॅक्सेस आहे आणि त्यासोबच माझी मॅनेजर म्हणून जी मुलगी काम करते तिच्याकडेची याचा अॅक्सेस आहे. तर ती मला म्हणते, 'या लोकांना मी काय रिप्लाय करू?, त्यावर "काहीही करु नको, सोडून द्यायचं." असं मी तिला सांगितलंय. म्हणजे मला तुझ्याशी लग्न करायचं असे मेल्स लोकं पाठवतात. आणि एक दोन नाहीतर वेगवेगळी लोक मेल करतात. कधीतर मध्येच फक्त हाय असे मेसेज करतात. पण, तुम्ही कोण आहात? काय करता? याबद्दल काहीच माहिती नसते. मग अशा लोकांना कसा रिप्लाय देणार?". असा मजेशीर किस्सा सायली संजीवने शेअर केला.
सायलीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिनं 'काहे दिया परदेस', 'शुभमंगल ऑनलाईन' या मालिकेत काम केलं आहे. ती 'झिम्मा' या चित्रपटातही झळकली होती. सध्या सायली संजीव 'समसारा' सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत आहे. 'काहे दिया परदेस' या मालिकेनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.