Join us

राजेश मापुसकर करणार महात्मा गांधी हत्येवर आधारित वेब सिरिजचे दिग्दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 10:00 IST

फरारी की सवारी चित्रपटातून हिंदी तर व्हेंटिलेटर चित्रपटातून मराठी दिग्दर्शनात पदार्पण करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुसकर आता ...

फरारी की सवारी चित्रपटातून हिंदी तर व्हेंटिलेटर चित्रपटातून मराठी दिग्दर्शनात पदार्पण करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुसकर आता गांधी हत्येसंदर्भातील वेब सिरिज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. या वेब सिरिजमध्ये मनोहर मालगावकर लिखित दि मेन हू किल्ड गांधी (The Men who killed Gandhi) या पुस्तकात उल्लेखलेल्या घटना आणि गांधींच्या हत्येवेळी भारतातील परिस्थिती यांचं चित्रण असणार आहे. याविषयी बोलताना लगे रहो मुन्नाभाई चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच गांधींजींच्या विचारांचा प्रभाव आपल्यावर असल्याचं म्हणत, ही सिरिज दिग्दर्शित करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही राजेश मापुसकर म्हणाले. केवळ दिग्दर्शनचं नव्हे तर सहनिर्मितीची धुरा ही राजेश मापुसकर सांभाळणार आहेत. तर या सिरिजची निर्मिती अबंडेंटिया एन्टरटेनमेंट करणार आहे.एकंदर या प्रोजेक्टविषयी आपले विचार मांडताना राजेश मापुसकर म्हणाले,“ इतिहास मला मोहिनी घालतो. लगे रहो मुन्नाभाईच्या चित्रिकरणावेळी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहताना गांधींजींच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर पडत होतो.आज 12 वर्षांनी, गांधीहत्येवर वेब सिरिज बनवण्यासाठी विक्रम मल्होत्राने मला विचारणा केली आणि मी लगेचच होकार कळवला. यानिमित्ताने दुसरी बाजू समजून घेण्याची संधी मिळाल्याचा मला नक्कीच आनंद आहे. नाण्याची ही दुसरी बाजू मी योग्यरित्या प्रेक्षकांसमोर मांडू शकेन, अशी आशा आहे.”व्हेंटिलेटर सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि तीन फिल्मफेअर पुरस्कारांचे मानकरी ठरलेले राजेश मापुसकर आता डिजीटल विश्वातही पाऊल टाकत आहेत.वास्तव पडद्यावर दाखविण्याची माझी नेहमीच इच्छा असते. प्रख्यात दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे चित्रपट क्षेत्रात काहीतरी करून दाखवता आले. 'फेरारी की सवारी' चित्रपटाला यश मिळाल्यानंतर मला मराठी चित्रपट करण्याची इच्छा होतीच कारण 'मराठी चित्रपटाला सध्या जो प्लॅटफॉर्म मिळाला आहे त्यामध्ये 'हृदयाची गोष्ट' सांगितली तर ती सहज चालू शकते असे मला वाटले आणि त्यातूनच 'व्हेंटिलेटर'ची निर्मिती झाली. या चित्रपटातील अनेक कलाकारांनी त्यांचे स्वत:चे काम करताना मला जी ऊर्जा दिली त्याचा चित्रपटाच्या यशावर चांगला परिणाम झाला असेही त्यांनी सांगितले असे राजेश मापुस्कर यांनी एका पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटाविषयी मत मांडले होते.