८० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत चित्रपटांसोबतच सेलिब्रिटींचे अफेअर्सही चर्चेत होते. आजही आपण अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), रेखा (Rekha) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्याबद्दल बोलतो. रेखा नेहमीच अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेम व्यक्त करत असत, पण बिग बींनी ते कधीही सार्वजनिकरित्या स्वीकारले नाही. एकदा रेखा यांनी असे काही केले ज्यामुळे जया बच्चन सर्वांसमोर रडल्या. हा किस्सा ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या लग्नातला आहे. जेव्हा रेखा त्यांच्या भांगेत सिंदूर लावून आल्या होत्या.
१९८० मध्ये ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचे लग्न झाले. त्यांच्या लग्नाची सर्वत्र खूप चर्चा झाली. चित्रपटसृष्टीतील बहुतेक लोक लग्नात सहभागी झाले होते. अमिताभ बच्चन देखील त्यांच्या पत्नी जयासोबत तिथे पोहोचले होते. रेखा लग्नात आल्या तेव्हा जया बच्चन नीतू कपूर यांच्यासोबत बसल्या होत्या.
जया बच्चन यांना कोसळलं रडूरेखा लग्नात पांढऱ्या रंगाची साडी आणि लाल टिकली लावून पोहोचल्या होत्या. त्यावेळी सर्वात जास्त चर्चा त्यांच्या भांगेतील सिंदूर होते. कॅमेराही रेखापासून दूर जात नव्हता. सिने ब्लिट्झच्या रिपोर्ट्सनुसार, रेखा आरके स्टुडिओच्या बागेकडे गेली आणि तिथे उभी राहिली. तिचे डोळे वारंवार अमिताभ बच्चन यांच्याकडे जात होते, जे दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्याशी बोलत होते. थोड्या वेळाने रेखा अमिताभ यांच्याकडे गेल्या आणि बोलू लागल्या. स्टारडस्ट मासिकाच्या वृत्तानुसार, अमिताभ आणि रेखा औपचारिकपणे बोलत होते. पण जया बराच वेळ संयम राखण्याचा प्रयत्न करत होत्या, परंतु नंतर त्यांना राहावलं नाही आणि त्यांना रडू कोसळलं.
रेखा यांनी स्पष्टीकरण दिले होतेनंतर रेखा यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. त्यांनी म्हटले होते की, सिंदूर आणि मंगळसूत्र हे त्यांच्या चित्रपटाच्या गेटअपचा भाग होते. त्या शूटिंगमधून थेट लग्नात आल्या होत्या आणि या सर्व गोष्टी काढायला विसरल्या होत्या.