Join us  

ट्विंकल खन्नाच्या या टोमण्याने अक्षयकुमारची व्हायची बोलती बंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 4:09 PM

बॉलिवूडमधील हिट कपल्सपैकी एक कपल म्हणून अक्षयकुमार आणि ट्विंकल खन्ना यांना ओळखले जाते. भलेही अक्षयकुमारच्या आयुष्यात कित्येक अभिनेत्री येऊन ...

बॉलिवूडमधील हिट कपल्सपैकी एक कपल म्हणून अक्षयकुमार आणि ट्विंकल खन्ना यांना ओळखले जाते. भलेही अक्षयकुमारच्या आयुष्यात कित्येक अभिनेत्री येऊन गेल्या, परंतु ट्विंकल खन्नाने बॉलिवूडच्या या खिलाडीवर असा काही कब्जा केला की, त्यातून त्याला सुटणे आता अशक्य आहे. मुळात अक्षय ट्विंकलसोबत खुश असून, त्यालादेखील तिच्यापासून दूर जाणे शक्य होणार नाही. असो आज आम्ही या दाम्पत्याच्या वैवाहिक जीवनातील एक किस्सा तुम्हाला सांगणार आहोत. २००१ मध्ये विवाहाच्या बंधनात अडकलेले हे दाम्पत्य आनंदी जीवन जगत आहेत. त्यांच्यातील प्रेम बघता दोघांमधील ट्यूनिंग लगेचच अधोरेखित होते. मात्र तुम्हाला माहीत आहे काय की, एका गोष्टीमुळे या दोघांमध्ये नेहमीच ताणाताणी व्हायची. अर्थात यात अक्षयलाच माघार घ्यावी लागत असे. वास्तविक ट्विंकल अक्षयला नेहमीच एक टोमणा मारायची. ती त्याला म्हणायची की, माझ्या वडिलांनी (राजेश खन्ना) अनेक अवॉर्ड मिळविले. परंतु तुला एकही अवॉर्ड मिळविता आला नाही. होय, वर्षातून चार-चार चित्रपट करणाºया अक्षयकुमारला जेव्हा एकही अवॉर्ड मिळत नसे तेव्हा ट्विंकल त्याला यावरून खूप टोमणे मारायची. विशेष म्हणजे ट्विंकलच्या या टोमण्यावर अक्षयकडे काहीच उत्तर नसायचे. त्यामुळे त्याची तिच्यासमोर बोलती बंद व्हायची. हा किस्सा स्वत: अक्षयनेच सांगितला आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर एका मुलाखतीत अक्षयने हा किस्सा सांगितला होता. अक्षयने म्हटले होते की, राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्या घरात मला टोमणे मारणे बंद झाले आहे. ‘जोपर्यंत मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नव्हता तोपर्यंत माझी पत्नी ट्विंकल खन्ना मला सारखी टोमणे मारायची. ती म्हणायची की, माझ्या वडिलांना आतापर्यंत अनेक अवॉर्ड मिळाले, परंतु तुला एकही अवॉर्ड मिळाला नाही. जेव्हा ट्विंकल मला हे सगळं सांगायची तेव्हा तिला उत्तर देण्यासाठी माझ्याकडे काहीच शब्द नसायचे. परंतु मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आता ट्विंकलचे टोमणे मारणे बंद झाले आहे. आता ती म्हणते की, तुला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. अक्षयकुमारला ‘रुस्तम’ या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ कलाकाराच्या श्रेणीत राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच्या या पुरस्कारावरून वादंगही निर्माण झाले होते. अक्षयने इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असल्याने त्याच्या चित्रपटांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काळात रिलीज झालेल्या त्याच्या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शविली.