Join us

वरुण धवनने केले मुलींच्या ‘पिरियड्स’ विषयी ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2017 17:19 IST

सध्या वरुण धवन त्याच्या आगामी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमामुळे व करीत असलेल्या भन्नाट ट्विटमुळे सर्वाधिक चर्चेत आहे. आता ...

सध्या वरुण धवन त्याच्या आगामी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमामुळे व करीत असलेल्या भन्नाट ट्विटमुळे सर्वाधिक चर्चेत आहे. आता तर चक्क त्याने मुलींच्या ‘पिरियड्स’ विषयी ट्विट केले आहे. मात्र तुम्ही हे ट्विट वाचाल तर त्याचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. ‘स्टूडेंट आॅफ द इयर’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणाºया वरुणने ट्विटमध्ये लिहले की, ‘मुलींना पुन्हा शाळेत पाठविण्यासाठी त्यांची मदत करा, मी माझे काम केले आहे, आता तुमची वेळ आहे’ या ट्विटबरोबर त्याने एक फोटोही शेअर केला आहे. त्याने पुढे लिहिले की, ‘भारतात पाच पैकी एका मुलीला पिरियड्समुळे शाळेत जाऊ दिले जात नाही.’ }}}} ">http://वरुणचे हे ट्विट सध्या चर्चेचा विषय बनले असून, त्याचे सोशल मीडियावर जोरदार अभिनंदन केले जात आहे. त्याचबरोबर त्याचे हे ट्विट मुलींना शाळेत जाण्यापासून रोखणाºयांसाठी एक प्रकारचा संदेशच ठरला आहे. दरम्यान, वरुणच्या या बेधडक ट्विटमुळे नेटिझन्सकडून त्याचे कौतुक केले जात असून, मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवू नका अशाप्रकारचा संदेश दिला जात आहे. सध्या वरुण त्याच्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमामुळे चर्चेत असून, त्याच्या प्रमोशनसाठी तो आलियासोबत प्रत्येक टीव्ही शोमध्ये झळकत आहे. या शोमध्ये दोघेही भरपूर एन्जॉय करीत असून, आपापली गुपितं प्रेक्षकांसमोर उघड करीत आहेत. पण काहीही असो वरुणने मुलींना शाळेत पाठविण्याविषयीचे आपले मत स्पष्ट करून या चळवळीला एकप्रकारे बळकटी दिली आहे, हे मात्र नक्की!