३०० कोटी कमावणाऱ्या ‘टायगर जिंदा हैं’चे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आहे खास कनेक्शन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 21:36 IST
सध्या बॉक्स आॅफिसवर ‘टायगर जिंदा हैं’ या चित्रपटाची जबरदस्त धूम बघावयास मिळत आहे. दुसºया आठवड्यातही कमाईचा असाच जोर राहणार ...
३०० कोटी कमावणाऱ्या ‘टायगर जिंदा हैं’चे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आहे खास कनेक्शन!
सध्या बॉक्स आॅफिसवर ‘टायगर जिंदा हैं’ या चित्रपटाची जबरदस्त धूम बघावयास मिळत आहे. दुसºया आठवड्यातही कमाईचा असाच जोर राहणार असल्याने चित्रपटाचा गल्ला किती कोटींपर्यंत पोहोचतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. दरम्यान, आतापर्यंत या चित्रपटाने भारतात २१७ कोटी रूपयांची कमाई केली आहे. तर वल्डवाइज तीनशे कोटी रूपयांपेक्षा अधिक कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने आठच दिवसांत हा कारनामा केल्याने चित्रपटाच्या कमाईत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे काय या चित्रपटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी खास कनेक्शन आहे? याबाबतचा खुलासा स्वत: चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी केला आहे. अली अब्बास जफर यांनी म्हटले की, ‘२०१४ मध्ये जेव्हा परिचारिकांना बंदी बनविण्यात आले होते, तेव्हाच नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. त्यावेळी केंद्र सरकारसमोर हा मुद्दा मार्गी लावण्याचे एकप्रकारे आव्हान निर्माण झाले होते. तेव्हा पीएम मोदी यांनी विदेशमंत्री सुषमा स्वराज आणि राष्टÑीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या साथीने ४६ परिचारिकांना इराकमधून इसिसच्या तावडीतून सुरक्षित सोडविण्यासाठी एक आॅपरेशन राबविले होते. अली अब्बास जफरने पुढे सांगितले की, परिचारिकांना वाचविण्यासाठी तब्बल दहा दिवस हे आॅपरेशन राबविण्यात आले होते. यादरम्यान एकही गोळी चालली नाही हे विशेष. या आॅपरेशनच्या माध्यमातून भारताने जगाला आपली ताकदही दाखवून दिली. मोदी यांच्या याच आॅपरेशनमुळे मी खूप प्रभावित झालो. त्यातूनच मी या विषयाशी निगडीत एक फिक्शन कथा लिहिण्यास सुरुवात केली. त्यातून ‘टायगर जिंदा हैं’ची कथा उदयास आल्याचे त्यांनी सांगितले. अली अब्बास जफर यांचा हा चित्रपट सध्या बॉक्स आॅफिसवर प्रचंड धूम करीत आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात या चित्रपटाला पसंती मिळत आहे.