Join us

सुनीता आहुजाने केलेला खुलासा ऐकून गोविंदाही झाला चकीत, तुम्हीही जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 19:24 IST

बºयाच कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करणारा अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता आहुजा हिने केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे खुद्द गोविंदाही चकीत ...

बºयाच कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करणारा अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता आहुजा हिने केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे खुद्द गोविंदाही चकीत झाला. गोविंदाच्या आगामी ‘आ गया हिरो’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जेव्हा तो पत्नी सुनीतासोबत कपिल शर्माच्या शोमध्ये पोहचला तेव्हा सुनीताने केलेले खुलासे त्याच्यासाठी खरोखरच धक्कादायक ठरले. सुनीता जेव्हा गर्भवती होती, तेव्हा ती तिच्याजवळ गोविंदाचा नव्हे तर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे पोस्टर ठेवत होती. वास्तविक त्या काळी गोविंदा प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर होता, अशातही सुनीताने सुपरस्टार अमिताभ यांचे पोस्टर जवळ ठेवले होते. खरं तर प्रत्येक पत्नीला आपलं बाळ आपल्या पतीवर जावे अशी इच्छा असते. त्यासाठी ते सतत पतीचे स्मरण करीत असते. मात्र सुनीताच्या मनात आपलं बाळ अमिताभ बच्चन यांच्यावर जावे असे तिला वाटत होते. त्यासाठी ती चक्क त्यांचे छायाचित्र असलेले पोस्टर जवळ ठेवत असे. जेव्हा सुनीता हे सर्व खुलासे करीत होती तेव्हा गोविंदा मात्र शांतपणे तिच्याकडे बघत होता. या दाम्पत्याला टिना आणि यशवर्धन नावाचे दोन मुले आहेत. गोविंदा आणि त्याची पत्नी पुन्हा एकदा कपिल शर्माच्या कॉमेडी शोच्या सेटवर पोहचली होती. मात्र यावेळेस गोविंदा त्याच्या ‘आ गया हिरो’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. यावेळी गोविंदा आणि सुनीता खूपच मस्तीच्या मुडमध्ये बघावयास मिळाले. दोघांनीही काही धक्कादायक खुलासेही केले. त्यातीलच एक खुलासा महानायक अमिताभ बच्चन यांच्या पोस्टरविषयीचा होता. जेव्हा सुनीता हा प्रसंग सांगत होती तेव्हा सेटवर उपस्थित असलेले गोविंदा, कपिल, सिद्धू यांच्यासह आॅडियन्सदेखील जोरजोरात हसत होते. असे पोस्टर ठेवण्यामागचे नेमके कारण काय? असे जेव्हा तिला विचारण्यात आले तेव्हा सुनीताने सांगितले की, माझा मुलगा या अ‍ॅक्टर्सप्रमाणे हॅण्डसम दिसावा अशी माझी इच्छा होती. तेव्हा सिद्धूने तिला मध्येच थांबवित यशवर्धन खरोखरच हॅण्डसम असल्याचे म्हटले. गोविंदाने इंडस्ट्रीमध्ये अनेक हिट सिनेमे दिलेले आहेत. एकेकाळी गोविंदाला इंडस्ट्रीमध्ये कॉमेडीचा स्टार कलाकार समजले जात होते. मात्र एक काळ असाही आला, ज्यामुळे त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. याविषयी गोविंदाने सांगितले की, जेव्हा मी करिअरच्या वाइट टप्यातून जात होतो तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, इंडस्ट्रीमधील लोक फक्त यशस्वी कलाकारांच्याच मागे पळत असतात. गोविंदाने ‘इल्जाम’ या सिनेमातून त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. ९०च्या दशकात आलेल्या ‘राजा बाबू, कुली नंबर १, हिरो नंबर १ आणि हसिना मान जाएगी’ यासारख्या हिट सिनेमांमधून तो प्रेक्षकांच्या मनात बसला होता. आता पुन्हा एकदा तो ‘आ गया हिरो’ या सिनेमातून कमबॅक करीत आहे. दीपांकर यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले असून, कथा गोविंदानेच लिहिली आहे. त्याचबरोबर सिनेमाला प्रोड्युसरही केले आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांचे कितपत मनोरंजन करणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच.