Join us

SHOCKING: ऋषी कपूरला का वाटते अमिताभ बच्चन करतात श्रेय देण्यात कंजूषी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 14:49 IST

बॉलीवूडमध्ये सध्या बॉक्स आॅफिसवर जरी मंदी असली तरी सेलिब्रेटींच्या विस्फोटक आत्मकथांमुळे वातावरण चांगलेच तापलेले आहे. करण जोहरच्या ‘अ‍ॅन अनसुटेबल ...

बॉलीवूडमध्ये सध्या बॉक्स आॅफिसवर जरी मंदी असली तरी सेलिब्रेटींच्या विस्फोटक आत्मकथांमुळे वातावरण चांगलेच तापलेले आहे. करण जोहरच्या ‘अ‍ॅन अनसुटेबल बॉय’मधील अनेक धक्कादायक खुलाशांनंतर आता ऋषी कपूर यांच्या ‘खुल्लम खुल्ला: ऋषी कपूर अनसेंसर्ड’ या आत्मकथनातून नवनवीन गुपीते बाहेर पडत आहेत.आपल्या सिनेप्रवासाचे कथन करताना या पुस्तकात ऋषी कपूर यांनी अमिताभ बच्चन यांच्याविषयी एक खंत बोलून दाखवली आहे. बिग बी त्यांच्या सिनेमातील सहकलाकारांना योग्य श्रेय देत नाही, असे त्यांचे म्हणने आहे.ते लिहितात की, ‘अमिताभ बच्चन हे सत्तरच्या दशकात खूप मोठे स्टार होते. त्याकाळात अ‍ॅक्शन चित्रपटांची चलती होती. त्यामुळे स्वभाविकपणे चित्रपटात अमिताभ यांना सर्वात चांगले डॉयलॉग, भूमिका मिळायची. सिनेमात इतर कलाकारांना मात्र त्यांच्या तुलनते कमजोर भूमिका दिल्या जायच्या. त्यामुळे संपूर्ण चित्रपटाचे श्रेय ते घेऊन जात. मी असो किंवा धमेंद्र, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, शशी कपूर, आम्हा सर्वांनाच याचा अनुभव आहे.’ALSO READ: ऋषी कपूर यांनी उघड केली राज कपूर यांची नर्गीस आणि वैजयंतीमालासोबतची अफेयर्सत्याकाळी मल्टीस्टारर चित्रपट करण्यात कोणतेच मोठे स्टार कमीपणा मानत नसत. ऋषी कपूर म्हणतात, ‘अमिताभ सर्वात मोठे स्टार आहेत याविषयी माझे काहीच दुमत नाही. आमच्या कोणाकडेच त्यांच्यासारखे एवढे मोठे स्टारडम नव्हते. परंतु याचा अर्थ होत नाही की, आम्ही कमी दर्जाचे अभिनेते होतो. आम्हाला जाणूनबुजून कमी व हलक्या भूमिका दिल्या जायच्या. चित्रपटाच्या यशाबाबत बोलताना अमिताभ नेहमीच दिग्दर्शक-लेखकांचे नाव घेतात. त्यांनी कधीच त्यांच्या सहकलाकारांना यशाचे मानकरी मानले नाही.’बिग बींच्या अशा वागण्यामुळे आम्हाला कधीच क्रे डिट मिळाले नाही. आम्ही जीवतोडून मेहनत करायचो. आमची सतत त्यांच्याशी तुलना केली जायची. पण लेखक-दिग्दर्शक कायमच त्यांना चांगले आणि मोठे रोल देत असल्यामुळे आमचे कधीच नाव झाले नाही, असे म्हणतात.आज मल्टीस्टारर सिनेमा का दिसत नाही याबाबत ते सांगतात की, ‘आजच्या काळात असा दुजाभाव सहन केला जाणार नाही. दोन सुपरस्टार्स एकमेकांच्या तुलनेत कमी महत्त्वाचा रोल कधीच स्वीकारणार नाही. आज जर शाहरुख मोठा स्टार असेल तर आमिर, सलमान किं वा हृतिक त्याच्याहून कमीपणाची भूमिका कधीच करणार नाहीत. पण आम्ही तसा विचार करायचो नाही. अमिताभ यांचे स्टारडम आम्ही मोठ्या मनाने स्वीकार केले होते. याचा अर्थ असा नाही आम्ही स्वत:ला कमी समजायचो पण तो काळ त्यांचा होता.’ALSO READ: ऋषी कपूरचे दाऊदसोबत चहापान!