कंगना राणौतच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे नाराज शाहरुख खानने तोडले तिचे स्वप्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 13:48 IST
शाहरुख खानसोबत काम करायला कोणाला आवडणार नाही? बॉलीवूडमधील तीन खान - आमिर, शाहरुख, सलमान - यांच्यासोबत चित्रपटात हीरोईन होणे ...
कंगना राणौतच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे नाराज शाहरुख खानने तोडले तिचे स्वप्न
शाहरुख खानसोबत काम करायला कोणाला आवडणार नाही? बॉलीवूडमधील तीन खान - आमिर, शाहरुख, सलमान - यांच्यासोबत चित्रपटात हीरोईन होणे हे प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असते. मात्र, ‘फिअरलेस’ कंगना राणौत याला अपवाद आहे. तिला या तिघांसोबतही काम करण्याची इच्छा नाही.‘कॉफी विथ करण’ या वादग्रस्त कार्यक्रमात करण जोहरने जेव्हा तिला विचारले की, शाहरुख, आमिर, सलमान यांपैकी कोणासोबत काम करायला आवडेल तेव्हा तिने स्वभावाप्रमाणे शॉकिंग उत्तर दिले होते की, ‘या तिन्ही खानांसोबत मला काम करण्याची इच्छा नाही.’►ALSO READ: ‘गोलमाल ४’ मध्ये दिसणार अजय देवगन-शाहरुख खानची जोडी?कंगनाच्या अशा बेधडक स्पष्टोक्तेपणामुळे तिचे संजय लीला भंसाळीसोबत काम करण्याचे स्वप्न पूर्ण होण्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. आणि त्यासाठी खुद्द किंग खान शाहरुख जबाबदार आहे. होय, भंसाळींच्या आगामी चित्रपटात कंगना मुख्य अभिनेत्री तर शाहरुख प्रमुख अभिनेता होता. मात्र शाहरुखने या चित्रपटास नकार दिल्याचे कळतेय. फिअरलेस कंगना: ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात कंगना राणौत आणि सैफ अली खानसुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भंसाळींनी शाहरुखला दोन पटकथांचा प्रस्ताव दिला होता. त्यापैकी एकामध्ये कंगना काम करणार होती. परंतु शाहरुखने कंगनाचा समावेश असलेला प्रस्ताव नाकारून दुसऱ्या पटकथेची निवड केली. त्यामुळे आता कं गनाच्या पटकथेवर चित्रपट तयार होईल की, नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे.►ALSO READ; कंगना राणौतचा व्हाईट बिकिनीतील हा हॉट अंदाज तुम्ही पाहिलाय का?शाहरुखने का नकार दिला याबाबत इंडस्ट्रीमध्ये खमंग चर्चा सुरू आहे. कंगनाच्या ‘खानांसोबत काम न करण्या’च्या वक्तव्यामुळे तर तो नाराज झाला नसेल ना अशीदेखील शक्यता आहे. शाहरुखच्या जवळच्या सुत्रांनी मात्र या वृत्ताचे खंडन केले असून शाहरुखचे कंगनाशी कोणत्याच प्रकारचे मतभेद नसून त्याला दुसरी स्क्रीप्ट अधिक आवडल्याने त्याने ती निवडली. कंगनाचा समावेश असणारी पटकथा ही ऐतिहासिक पार्श्वभूमिवर आधारित होती आणि शाहरुखला ती फारशी न आवडल्यामुळे त्याने नकार दिला.खरे कारण काय हे त्यांनाचा माहित पण किंग खानने नकार दिल्यामुळे भंसाळी या कंगनासाठी त्या चित्रपटाची निर्मिती करतील का हा मोठा प्रश्न आहे. कंगनाने वेळोवेळी भंसाळींसोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखविलेलली आहे.