Join us

​ सलमान खानच्या रोज नव्या अटींमुळे हैराण झालेत ‘रेस3’चे मेकर्स! बदलावी लागणार स्क्रिप्ट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2017 13:11 IST

‘रेस3’चे शूटींग सुरु झाल्याची खबर तुम्ही वाचली असेलच. पण शूटींग सुरु होत नाही तोच ‘रेस3’चे मेकर्स हैरान झाले असल्याची ...

‘रेस3’चे शूटींग सुरु झाल्याची खबर तुम्ही वाचली असेलच. पण शूटींग सुरु होत नाही तोच ‘रेस3’चे मेकर्स हैरान झाले असल्याची खबर आहे. कुणामुळे? तर सलमान खानमुळे. होय, सलमानच्या रोज नव्या अटींमुळे मेकर्स हैराण आहेत. इतके की,सलमानला या चित्रपटात घेऊन आपण चूक तर केली नाहीयं ना? असा प्रश्न मेकर्सला पडला आहे.आता भाईजान सलमानचा स्वभाव तर तुम्हाला चांगलाच ठाऊक आहे. सलमान कुठल्याही चित्रपटात काम करो, तो आपल्या अटींवर काम करतो. भाईजानच्या मर्जीशिवाय काहीच होत नाही. मग ती चित्रपटाची स्क्रिप्ट असो वा चित्रपटाची कास्ट. साहजिकच ‘रेस3’मध्ये सुद्धा सलमान हेच करू पाहतोय. सलमानने म्हणे, ‘रेस3’च्या मेकर्सपुढे काही अटी ठेवल्या आहेत. या अटी मान्य केल्याशिवाय मेकर्सपुढे कुठलाही पर्याय उरलेला नाही. सलमानच्या अशा वागण्यामुळे मेकर्स त्रासले आहेत, हे सांगणे नकोच.ALSO READ: कॅटरिना कैफमुळे वादात सापडू शकतो ‘टायगर जिंदा है’ ! सेन्सॉर बोर्डाला खटकू शकतो ‘लव्ह अँगल’!!आता सलमान म्हणतोय तरी काय? तर सलमानने अनेक अटी ठेवल्या आहेत. ‘रेस3’मध्ये कुठलाही इंटिमेट सीन नसेल, ही सलमानची पहिली अट आहे. याशिवाय चित्रपटात कुठलाही ड्रग्ज डिलिंगसारखा सीन नको, असे फर्मानही त्याने सोडले आहे. परिणामी चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये ऐनवेळी बदल करावे लागणार आहेत. पण सलमानला याची चिंता नाही. स्क्रिप्टमध्ये लवकरात लवकर बदल करावेत, असे सांगून सलमान मोकळा झाला आहे. लहान मुलांनाही आपला चित्रपट बघता यावा, हा यामागचा सलमानचा उद्देश आहे. कारण सलमानच्या चाहत्यांमध्ये लहान मुलांची संख्याही मोठी आहे. याशिवाय सलमानची आणखी एक अट आहे. ‘रेस3’मध्ये सलमानशिवाय बॉबी देओल, डेजी शाह, आदित्य पांचोली, पूजा हेगडे, फ्रेडी दारूवाला यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘रेस’ आणि ‘रेस2’मध्ये अनिल कपूरही दिसला होता. पण ‘रेस3’मध्ये अनिल कपूर नसल्याचे कळते. पण सलमानला अनिल कपूरही चित्रपटात हवा आहे. त्यामुळे चित्रपटात अनिल कपूरसाठी जागा बनवा, असे त्याने बजावले आहे. आता सलमानच्या या अटी मेकर्स किती मानतात आणि मानल्याच तर या अटींचा चित्रपटाला किती फायदा होतो, ते बघूच.