Join us  

सलमान खान सांगतोय, सुभाष घईने माझ्या शूजवर केले होते मुत्रविसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2017 11:41 AM

सुभाष घईच्या युवराज या चित्रपटात सलमान खानने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात सलमानच्या नायिकेची भूमिका कतरिना कैफने साकारली ...

सुभाष घईच्या युवराज या चित्रपटात सलमान खानने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात सलमानच्या नायिकेची भूमिका कतरिना कैफने साकारली होती. या चित्रपटात सुभाष घई आणि सलमान खान यांनी एकत्र काम केले असले तरी अनेक वर्षांपूर्वी सुभाष घई आणि सलमान खान यांच्यात प्रचंड भांडणे होती. ते दोघे एकमेकांशी बोलत देखील नसत. त्या दोघांमध्ये कोणत्या कारणांवरून भांडणे होती हे सलमाननेच २००२ साली दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते.२००२ मध्ये सलमान आणि ऐश्वर्या रायची प्रचंड भांडणे झाली होती. सलमान आणि ऐश्वर्या हम दिल दे चुके सनम या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण नंतर त्यांच्यात दुरावा आला. सलमानने ऐश्वर्यावर हात देखील उचलला असल्याचे अनेक वर्तमानपत्रात छापून आले होते. या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना सलमानने सांगितले होते, मी तिला कधीच मारलेले नाही. मी जर भावूक झालो तर मी स्वतःला इजा करून घेतो. मी भिंतीवर माझे डोके आपटतो. मी दुसऱ्याला इजा करण्याचा कधी विचार देखील करू शकत नाही. मी केवळ सुभाष घईला एकदा मारले होते आणि त्याबाबत दुसऱ्याच दिवशी त्याची भेट घेऊन त्याची माफी देखील मागितली होती. कधी कधी काही गोष्टी घडतात. ज्यामुळे आपला रागावर ताबा राहात नाही. एकदा त्याने मला चमच्याने मारले होते. एक प्लेट माझ्या चेहऱ्यावर अक्षरशः फोडली होती. एवढेच नव्हे तर त्याने माझ्या शूजवर मूत्रविसर्जन केले होते आणि माझी कॉलर देखील पकडली होती. त्यामुळे मला माझ्या रागावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे मी सुभाष घईवर हात उचलला होता. पण मी दुसऱ्या दिवशी जाऊन त्याची माफी देखील मागितली होती. सुभाष घई आणि सलमान मध्ये भांडणे झाल्यानंतर सलमानचे वडील सलीम खान यांनी दुसऱ्या दिवशी सुभाष घईला फोन केला होता आणि त्यानंतर तासा भराच्या आतच सलमानने जाऊन सुभाष घईची माफी मागितली होती. त्यामुळे ते प्रकरण तिथेच मिटले होते. Also Read : ​सलमान खानच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या अभिनेत्रीने आजवर केले नाही लग्न