Join us

‘दत्त’ बायोपिकमध्ये राजकुमार हिराणी साकारणार ‘ही’ खास भूमिका!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 22:41 IST

जर तुम्ही दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या आगामी ‘दत्त’ या बायोपिकची आतुरतेने वाट बघत असाल, तर तुमच्यासाठी आमच्याकडे एक आनंदाची ...

जर तुम्ही दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या आगामी ‘दत्त’ या बायोपिकची आतुरतेने वाट बघत असाल, तर तुमच्यासाठी आमच्याकडे एक आनंदाची बातमी आहे. होय, चित्रपटात स्वत: दिग्दर्शक राजकुमार हिराणी एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना बघावयास मिळू शकतात. आतापर्यंत आपण दिग्दर्शक सुभाष घई यांना पडद्यावर भूमिका साकारताना बघितले होते. परंतु आता या रांगेत राजकुमार हिराणी यांचेदेखील नाव जोडले जाणार आहे. चित्रपटात संजय दत्तची भूमिका अभिनेता रणबीर कपूर साकारत आहे. तर परेश रावल, मनीषा कोईराला, अनुष्का शेट्टी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘राजकुमार हिराणी दिग्दर्शक सुभाष घई यांची भूमिका चित्रपटात साकारणार असल्याचे बोलले जात आहे. सुभाष घई यांच्या ज्या चित्रपटात संजूबाबाने काम केले आहे. ज्यामध्ये ‘खलनायक’ या सुपरहिट चित्रपटाचा समावेश आहे. तीच भूमिका राजकुमार हिराणी करू शकतात.  दरम्यान ‘दत्त’ बायोपिकबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, हा चित्रपट केव्हा रिलीज होईल याविषयी दिवसागणिक उत्सुकता वाढत आहे. नेहमीच सुपरहिट चित्रपट बनविणारे दिग्दर्शक स्वत:च पडद्यावर भूमिका करणार असल्याने, चाहत्यांसाठी हा अनुभव सुखद असेल यात शंका नाही. सध्या ‘दत्त’च्या अखेरच्या भागाचे शूटिंग सुरू आहे. शूटिंगसाठी अनुष्का शर्मा न्यूयॉर्कला असून, ज्या सीन्सची शूटिंग केली जाणार आहे, तो भाग संजय दत्तच्या आयुष्यातील अतिशय खडतर समजला जातो. असे म्हटले जात आहे की, ‘दत्त’ची शूटिंग करायची असल्याने अनुष्का ‘आयफा २०१७’मध्ये सहभागी होऊ शकली नाही. शिवाय रणबीरही सध्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने तोदेखील न्यूयॉर्कमध्ये ठाण मांडून बसला आहे. ‘दत्त’ बायोपिकच्या रिलीजविषयी सांगायचे झाल्यास, यावर्षाच्या अखेरपर्यंत हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता होती, परंतु आता येत असलेल्या वृत्तानुसार हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. असे झाल्यास ‘दत्त’ची टक्कर सलमान खानच्या चित्रपटाशी होणार आहे. या चित्रपटात सलमान अतिशय डॅशिंग अंदाजात असून, चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूजा करणार आहे; मात्र याबाबतची अद्यापपर्यंत कुठलीही घोषणा झालेली नाही.