भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित स्टार्सपैकी एक असलेल्या मधुबाला(Actress Madhubala)चे आयुष्य प्रेम, ब्रेकअप आणि अपूर्ण स्वप्नांनी भरलेले होते. दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर त्यांच्या वडिलांच्या प्रभावाखाली त्यांनी एका छोट्या सोहळ्यात गायक किशोर कुमार (Kishor Kumar) यांच्याशी लग्न केले.
लग्नानंतर लगेचच किशोर मधुबाला यांना त्यांच्या हृदयरोगावर उपचार करण्यासाठी लंडनला घेऊन गेले. पण त्यांना जे कळले त्यामुळे सगळेच बदलून गेले. मधुबालाची बहीण मधुर भूषण म्हणाल्या की, डॉक्टरांनी अभिनेत्रीला सांगितले होते की, ती सामान्य वैवाहिक जीवन जगू शकत नाही. आम्ही ते चुकीचे आहेत असे म्हणत नाही आहोत. डॉक्टरांनी आपाला सांगितले होते की तुम्ही शरीर संबंध ठेवू शकत नाही आणि तुम्हाला मुले होऊ शकत नाहीत'.
किशोर कुमार यांनी अभिनेत्रीला माहेरी आणून सोडलं
फिल्मफेअरशी बोलताना मधुबालाची बहीण मधुर भूषण म्हणाल्या की, 'स्त्रीला काहीही असो, भावनिक आधाराची आवश्यकता असते'. मधुर भूषणने असाही दावा केला की, आजारपणाचे निदान झाल्यानंतर लगेचच किशोर यांनी मधुबाला यांना त्यांच्या पालकांच्या घरी सोडले आणि कुटुंबाला सांगितले की, ते त्यांचे करिअर सांभाळत त्यांची काळजी घेऊ शकत नाही. किशोर भैय्या तिला आमच्या घरी सोडून गेले आणि म्हणाले की ती आजारी आहे आणि तिला काळजीची गरज आहे, तर त्यांना प्रवास करावा लागतो. काम करावे लागते, गाणे गावे लागते आणि त्यामुळे ते तिला वेळ देऊ शकणार नाहीत.
३६व्या वर्षी झालं अभिनेत्रीचं निधन
त्या पुढे म्हणाल्या की, मी माझे सर्वतोपरी प्रयत्न केले, मी तिला लंडनला घेऊन गेले. पण डॉक्टरांनी सांगितले की ती जगणार नाही. माझी काय चूक आहे? मधुबाला यांचे १९६९ साली केवळ ३६ व्या वर्षी दीर्घ आजाराने मधुबालाचे निधन झाले.