सिनेविश्वातून अनेकदा अभिनेत्रींमध्ये कॅटफाइट सुरू असल्याच्या बातम्या येतात. करीना कपूर खान (Kareena Kapoor) आणि प्रीती झिंटा (Preity Zinta) या इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. एकेकाळी दोघींमध्ये मतभेद होते. प्रीती आणि करीना यांनीही याबद्दल चर्चा केली होती. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये हे उघड झाले होते. 'कॉफी विथ करण'च्या एका जुन्या भागात, राणी मुखर्जी आणि करीना कपूर पाहुणे म्हणून आल्या होत्या. या भागात करण जोहरने प्रीती झिंटाचा एक व्हिडीओ प्ले केला होता. या व्हिडीओमध्ये प्रीती म्हणाली होती की, करीनाने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि तिला हे आवडले नाही.
व्हिडीओमध्ये प्रीती झिंटा म्हणाली, ''करीना, 'कल हो ना हो'साठी धन्यवाद. यासाठी मला दोष देऊ नकोस. तू नेहमीच याबद्दल बोलतेस. मला तुझ्याबाबतीत काहीच प्रॉब्लेम नाही. पण तू माझ्याकडे दुर्लक्ष करतेस या गोष्टीची मला समस्या आहे. मला हे आवडत नाही. आपण दोघीही भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकार आहोत. मला वाटते की आपण शांत राहायला हवे.'' यादरम्यान, प्रीतीच्या चेहऱ्यावर हास्य होते. प्रीतीने सांगितले की, ''जेव्हा करण जोहर आजूबाजूला असतो तेव्हा करीना फक्त तिला हाय म्हणते.''
'कल हो ना हो'साठी बेबोची झालेली निवड, पण...
करीना कपूरला करण जोहरचा 'कल हो ना हो' हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. पण शेवटी हा चित्रपट प्रीती झिंटाला देण्यात आला. या चित्रपटात प्रीती झिंटाचे काम प्रेक्षकांना खूप आवडले. त्यामुळेच करीना आणि प्रीतीमध्ये दुरावा निर्माण झाला. त्याचवेळी, करीनाने हे देखील मान्य केले की, करण जोहरसोबतची तिची मैत्री एक वर्षापासून संपली होती. करीनाला याचा पश्चात्ताप आहे. करीनाने असेही म्हटले की प्रीतीने चित्रपटात उत्तम काम केले आहे आणि 'कल हो ना हो' या चित्रपटानंतर तिच्या कारकिर्दीला वेग मिळाला.