Join us

Inside House Photo: असा आहे इरफान खानचा आलिशान आशियाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 12:45 IST

आपलं स्वप्नातलं घरा खास असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असते.हे स्वप्नपूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण झटत असतो.प्रत्येकाच्या स्वप्नातील घराच्या कल्पना या ...

आपलं स्वप्नातलं घरा खास असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असते.हे स्वप्नपूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण झटत असतो.प्रत्येकाच्या स्वप्नातील घराच्या कल्पना या वेगवेगळ्या असतात. त्या दृष्टीने आपल्या स्वप्नातलं घर घडवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मेहनत करत असतो.याला कलाकार मंडळीही अपवाद नसतात.विशेष म्हणजे म्हणजे आजपर्यंत अनेकदा बॉलिवूड कलाकारांचीआलिशान घराचे बाहेरील आणि आतील छायाचित्रे अनेकदा समोर आली आहेत.सोशल मीडियावर शाहरूख,सलमान यांच्या घरांप्रमाणे आता आणखीन एका अभिनेत्याच्या घराचे फोटो खूप व्हायरल झाले आहेत.तो अभिनेता म्हणजे इरफान खान.इरफान खानने सिनेसृष्टीत मोठ्या मेहनतीने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. रसिकांच्या मनात घर केलेल्या आपल्या या लाडक्या अभिनेत्यावर ते जीव ओवाळून टाकण्यासही मागे पुढे पाहत नाहीत.इरफान खानवर रसिकांचं प्रेम इतकं आहे की त्याच्याबद्दलच्या सगळ्याच गोष्टी जाणून घेण्यात रसिकांना रस असतो. आजपर्यंत अनेकदा बॉलिवूड कलाकारांची आलिशान घराचे बाहेरील आणि आतील छायाचित्रे अनेकदा समोर आली आहेत.त्यामुळे आज  इरफान खानच्या आलिशान आशियानाविषयी काही खास गोष्टी जाणून घेवूया. मालाड येथील मार्वे बीच परिसरात इरफान खानने तीन मजली भव्य बंगला बांधला आहे.येथेच इरफान त्याच्या कुटुंबासह राहत होता. मात्र त्यानंतर इरफानने 2015साली मुंबईतील ओशिवरा येथे एक आलिशान फ्लॅट खरेदी केला होता.या घराचे इंटेरिअरही खास पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे.इंटेरिअर डिझायनर शबनम गुप्ताने या घराचे सुंदर इंटेरिअर केले आहे.या सुंदर आलिशान फ्लॅटचे  आतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.चार बेडरूम, लिविंग एरिया,किचन तसेच एक लायब्ररीही या घरात बनवण्यात आली आहे.शेअर झालेल्या फोटोंमध्ये इरफान फॅमिलीसोबत मस्त घरात निवांत क्षण घालवताना दिसत आहे.नुकतेच इरफान खानने वयाची 50वर्षे पूर्ण केली आहेत.इऱफानने सुतापा सिकदरसह 1995 मध्ये लव्ह मॅरेज करत सुखाने संसार करत आहेत.इरफानची अभिनय क्षेत्रातील सुरुवातीची वर्षे फारच संघर्षाची राहिलेली आहे. टीव्ही सीरियल्समधून त्याने अभिनयाला सुरुवात केली होती. 'भारत एक खोज', 'चाणक्य' सारख्या मालिकांमधून तो टीव्हीवर झळकला होता. टीव्ही सीरियल ते चित्रपट असा 10 वर्षे त्याला संघर्ष करावा लागला होता.