Join us  

कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय? अखेर अभिनेत्यानं सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 10:10 AM

गोविंदाने एका मुलाखतीत वादामागचं खरं कारण सांगितलं आहे.

अभिनेता गोविंद आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. गेल्या काही वर्षांपासून या दोघांनी अबोला धरला होता. पण, नुकतेच गोविंदाने भाची आरती सिंहच्या लग्नाला उपस्थित राहून  भाचा कृष्णा अभिषेकसोबतचा वाद अखेर मिटवला आहे.  आता गोविंदाने एका मुलाखतीत वादामागचं खरं कारण सांगितलं आहे.

गोविंदाचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. यामध्ये गोविंदाने वादामागील कारण सांगितलं आहे. व्हिडीओमध्ये गोविंदा म्हणातो, 'कृष्णाला जेव्हा मुलं झाली तेव्हा मी त्यांना बघायला रुग्णालयात गेलो होतो. माझ्यासोबत माझी पत्नी सुनीतासुद्धा होती. आम्ही त्याच्या मुलांना लांबून तर पाहिलं होतं, पण आम्हाला त्यांच्या जवळ जाण्याची परवागनी नव्हती. मुलांना आम्ही उचलून घेण्याचाही प्रयत्नही केलेला पण कदाचित इन्फेक्शनमुळे त्यांनी आम्हाला थांबवलं होतं. ही गोष्ट मी त्याला चार वेळा सांगितली की मी तुझ्या मुलांना भेटून आलो आहे. तरीसुद्धा तो ते मानायलाच तयार नाही. तो कोणत्याही मुलाखतीत फक्त हेच म्हणतो की मामा माझ्या मुलांना बघायला आले नाहीत'. 

कृष्णा आणि गोविंदा यांच्यातील वादाची सुरुवात कश्मीरा शाहच्या ट्वीटने झाली होती. त्याचं झालं असं की, कृष्णा एक शो करत होता, ज्यामध्ये गोविंदाने आधी येण्यास नकार दिला होता. यातच कॉमेडियनची पत्नी कश्मिराने एक ट्वीट केले, ज्यामध्ये काही लोक पैशासाठी नाचतात, असे लिहिले होते. गोविंदाची पत्नी सुनीताला कश्मिराचं हे ट्वीट आपल्या कुटुंबासाठी असल्याचं वाटलं, त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला. 

यानंतर मात्र, कृष्णाने मतभेद दूर करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला आणि गोविंदाची माफीही मागितली. आपल्या विधानांचा अनेकदा विपर्यास केल्याचं त्यानं म्हटलं होतं. मनीष पॉलच्या पॉडकास्ट शोमध्ये कृष्णानं गोविंदाची माफी मागितली होती. त्यानंतर गोविंदानं देखील याचं पॉडकास्टमध्ये हजेरी लावून कृष्णाला माफ केल्याबद्दल सांगितलं होतं. आता आरती सिंहच्या लग्नात हा वाद मिटला, असं म्हणायला हरकत नाही. 

 

टॅग्स :गोविंदासेलिब्रिटीबॉलिवूड