Join us

"ड्रिंक करुन बेशुद्ध व्हायचो आणि...", आमिर खानने सांगितला 'तो' कठीण काळ, नेमकं काय घडलेलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 10:16 IST

आमिर खानने सांगितला 'तो' कठीण काळ, काय घडलेलं? 

Aamir Khan: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटांची सर्वत्र प्रशंसा होताना दिसतेय. बॉक्स ऑफिसवरही सितारे जमीन पर चित्रपटाने चांगला व्यवसाय केला आहे. दरम्यान, आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत येणारा आमिर खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बऱ्याचदा चर्चेत राहिला. सध्या आमिर खान त्याने एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने त्याच्या पूर्वपत्नी रीना दत्तासोबत झालेल्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. 

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्याबद्दल खुलासा केला. त्यादरम्यान, रीना दत्तापासून घटस्फोट घेतल्यानंतर त्याला खूप त्रास होऊ लागला होता, असा खुलासा त्याने केला. त्याबद्दल सांगताना अभिनेता म्हणाला, "रीना घर सोडून गेल्यानंतर खूप एकटं वाटत होतं आणि कळत नव्हतं? अस्वस्थ वाटायचं. जेव्हा घरी कोणीही नसायचं आणि मला एकटेपणा जाणवत असे. त्यावेळी मी पहिल्यांदाच दारुच्या बाटलीला हात लावला होता. तेव्हा रात्रभर दारू प्यायचो आणि मी बेशुद्ध व्हायचो. हे सगळं जवळपास दीड वर्ष चालू होतं. त्यावेळी जुही चावला, सलमान खान आणि अनिल कपूर यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी मला यातून बाहेर पडण्यास मदत केली." असा खुलासा अभिनेत्याने केला. 

पुढे अभिनेता म्हणाला, "एके दिवशी अचानक मला जुही चावला फोन आला. ती मला म्हणाली, मी आताच तुझ्या घरी येते मला तुला भेटायचं आहे. मी आणि जुही जवळपास सात वर्षे एकमेकांशी बोलत नव्हतो. ती घरी  आल्यानंतर मला म्हणाली, मी तुझ्या आणि रीनाबद्दल पेरपरमध्ये वाचलं. तेव्हा तिने मल खूप समजावलं. "

आमिर खान रिना दत्ता आणि किरण राव यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर नव्याने सुरुवात केली आहे. सध्या तो त्याची नवी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटमुळे चर्चेत आहे. अलिकडेच सितारे जमीन पर च्या प्रिमिअरला गौरी स्प्रॅट देखील हजर होती. तेव्हा त्याने सगळ्यांसोबत तिची ओळखही करुन दिली. 

टॅग्स :आमिर खानबॉलिवूडसेलिब्रिटी