Join us  

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन मोठ्या पडद्यावर दिसणार का पुन्हा एकत्र ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2017 11:14 AM

पुन्हा एकदा रिअल लाईफमधले कपल रिल लाईफमध्ये पुन्हा एका मोठ्या पडद्यावर कपबॅक करण्यास सज्ज झाले आहे. गुरु चित्रपटातून आपली ...

पुन्हा एकदा रिअल लाईफमधले कपल रिल लाईफमध्ये पुन्हा एका मोठ्या पडद्यावर कपबॅक करण्यास सज्ज झाले आहे. गुरु चित्रपटातून आपली केमिस्ट्री दाखवलेले अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. 2010मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या रावण या चित्रपटातनंतर ही जोडी पुन्हा एकत्र दिसलीच नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  हे दोघ आपल्याला लवकरच एकत्र दिसणार आहेत. गुलाब जामुन या चित्रपटात अभिषेक आणि ऐश्वर्या काम करणार असल्याचे समजतेय. अनुराग कश्यप हा या चित्रपटाचा निर्माता असल्याचे समजतेय. जर दोघांनी हा प्रॉजेक्ट साइन केला तर ऐश्वर्या आणि अभिषेकच्या फॅन्ससाठी ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी असले. त्यांचे चाहते त्यांना एकत्र बघण्यासाठी फारच उत्सुक आहेत. याआधी ऐश्वर्या आणि अभिषशेकने ढाई अक्षऱ प्रेम के कुछ ना कहो उमराव जान धूम 2 सरकार राज यासारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे.  गुरु चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली. या चित्रपटाच्या  शूटिंग दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. लग्नानंतर मात्र ऐश्वर्याने पत्नी आणि आईच्या भूमिकेत राहणंच पसंत केले. ऐश्वर्या कुठल्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी किंवा एअरपोर्टवर सतत मुलगी आराध्यासोबतच दिसते. तिने आराध्याच्या जन्मानंतर मोठ्या पडद्यापासून दूर राहणंच पसंत केले. ऐ दिल है मुश्किल या चित्रपटद्वारे तिने पुन्हा एका बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. रणबीरसोबत दिलेल्या हॉट सीन्सची बी टाऊनमध्ये चर्चादेखील खूप झाली. आता अभिषेक आणि ऐश्वर्याची जोडी पुन्हा एकदा आपल्याला त्यांची रिअल लाईफमधील केमिस्ट्री पडद्यावर दाखवायला येणार असल्याचे समजतेयं.