बॉलिवूड अभिनेता आमिर खान ९० च्या दशकातील सर्वाधिक यशस्वी अभिनेता आहे. कदाचित याचमुळे आमिरच्या चित्रपटांचे तिकिट खरेदी करण्यापूर्वी प्रेक्षक एकदाही विचार करत नाही. अर्थात गतवर्षी आलेल्या आमिरच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाने प्रेक्षकांची प्रचंड निराशा केली. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना अपार अपेक्षा होत्या. पण ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ प्रदर्शित झाला आणि या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ फ्लॉप झाल्यावर आमिरने प्रेक्षकांची माफी मागितली, ती याचमुळे आणि कदाचित याचमुळे आमिरला पुन्हा एकदा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ची पुनरावृत्ती करायची नाही. याच आधारावर आमिरने एक मोठा निर्णय घेतला आहे.
‘ठग्स’ फ्लॉप होताच, आमिर खानने ‘गजनी 2’साठी कसली कंबर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 12:20 IST
आमिरला पुन्हा एकदा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ची पुनरावृत्ती करायची नाही. याच आधारावर आमिरने एक मोठा निर्णय घेतला आहे.
‘ठग्स’ फ्लॉप होताच, आमिर खानने ‘गजनी 2’साठी कसली कंबर!
ठळक मुद्देटायटल रजिस्टर झाल्यानंतर ‘गजनी 2’ची प्लानिंग होतेय, हे नक्की. हा चित्रपट कोण दिग्दर्शित करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ‘गजनी’ हा चित्रपट ए. आर. मुरगदास यांनी दिग्दर्शित केला होता. आता ‘गजनी 2’ कोण दिग्दर्शित करणार, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.