LIC Bima Sakhi Yojana: भारत सरकार देशात महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी विविध योजना आणते. या योजनांद्वारे महिलांचा सामाजिक सहभाग वाढवणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे, हा उद्देश असतो. आता सरकारने भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीच्या माध्यमातून महिलांसाठी एक खास योजना आणली आहे.
एलआयसीच्या या योजनेचे नाव 'विमा सखी योजना' आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ डिसेंबर २०२४ रोजी हरियाणामध्ये याची सुरुवात केली. या योजनेद्वारे ग्रामीण भागातील महिलांना एलआयसीकडून प्रशिक्षण दिले जाते आणि विमा एजंट म्हणून काम दिले जाते. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे.
या योजनेद्वारे महिलांना ३ वर्षांसाठी प्रशिक्षण दिले जाते. ज्यामध्ये त्यांना पहिल्या वर्षी दरमहा ७००० रुपये दिले जातात. दुसऱ्या वर्षी दरमहा ६००० रुपये दिले जातात, तर तिसऱ्या वर्षी त्यांना दरमहा ५०० रुपये स्टायपेंड दिले जाते. म्हणजे, एकूण ३ वर्षात महिलांना २ लाख रुपयांपेक्षा जास्त आर्थिक मदत मिळते. या स्टायपेंड व्यतिरिक्त, महिला पॉलिसी विकून पहिल्या वर्षी ४८००० रुपयांपर्यंत कमिशन देखील मिळवू शकतात.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांना विमा सखी प्रमाणपत्र आणि एलआयसी एजंट कोड देखील दिला जातो. त्यानंतर महिला अधिकृतपणे विमा एजंट म्हणून काम करू शकतात. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला LIC वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.