Lokmat Money > बिझनेस न्यूज > टाटा सन्स 'या' व्यवसायांमध्ये ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार, कोणते आहेत बिझनेस, काय होणार फायदा?

टाटा सन्स 'या' व्यवसायांमध्ये ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार, कोणते आहेत बिझनेस, काय होणार फायदा?

टाटा समूह हे देशातील सर्वात मोठं औद्योगिक घराणं आहे. टाटा सन्स ही होल्डिंग कंपनी आपल्या नव्या कंपन्यांमध्ये ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कोणते आहेत ते व्यवसाय जाणून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 12:07 IST2025-06-02T12:04:34+5:302025-06-02T12:07:07+5:30

टाटा समूह हे देशातील सर्वात मोठं औद्योगिक घराणं आहे. टाटा सन्स ही होल्डिंग कंपनी आपल्या नव्या कंपन्यांमध्ये ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कोणते आहेत ते व्यवसाय जाणून घेऊ.

Tata Sons will invest Rs 30000 crore in these businesses which are the businesses what will be the benefits | टाटा सन्स 'या' व्यवसायांमध्ये ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार, कोणते आहेत बिझनेस, काय होणार फायदा?

टाटा सन्स 'या' व्यवसायांमध्ये ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार, कोणते आहेत बिझनेस, काय होणार फायदा?

टाटा समूह हे देशातील सर्वात मोठं औद्योगिक घराणं आहे. टाटा सन्स ही होल्डिंग कंपनी आपल्या नव्या कंपन्यांमध्ये ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. टाटा डिजिटल, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, एअर इंडिया, डिफेन्स आणि बॅटरी युनिटमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. ही गुंतवणूक इक्विटीच्या माध्यमातून केली जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संरक्षण व्यवसायाला धोरणात्मक प्राधान्य देण्यात आलंय. टाटा सन्सच्या संचालक मंडळानं गुरुवारी झालेल्या बैठकीत या वाटपाला मंजुरी दिली. हा निधी अलीकडच्या वर्षांत नवीन व्यवसायांसाठी केलेल्या १२० अब्ज डॉलरच्या व्यतिरिक्त आहे.

ईटीनं दिलेल्या वृत्तानुसार, समूहाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, हे भांडवल गुंतवणं हे कंपनीच्या योजनेचा भाग आहे. यामुळे नवीन व्यवसायांना पुढील स्तरावर नेण्यास मदत होईल. टाटा डिजिटलच्या नव्या सीईओची घोषणा लवकरच होणार आहे. टाटा सन्सनं आधीच बरीच गुंतवणूक केली आहे. आता पुढील सर्व गुंतवणूक प्राधान्यानं केली जाणार आहे. नवीन व्यवसायांना गुंतवणूक मिळवण्यासाठी स्वत:ला सिद्ध करावं लागतं असंही या अधिकाऱ्यानं सांगितलं.

तुर्कस्तानला झटक्यावर झटका.., पाकिस्तानची साथ पडतेय भारी; आता Air India नं घेतला मोठा निर्णय 

टॉप ५ मध्ये स्थान मिळवण्याचं ध्येय

टाटा सन्ससाठी हे व्यवसाय अत्यंत महत्त्वाचे आहेत. सुरुवातीचा टप्पा संपला, आता वेगानं काम करून नफा कमवावा, असा त्यांचा विचार आहे. हा धोरणात्मक प्रयत्न आहे. झपाट्याने बदलणाऱ्या जगात टाटा समूहाची स्पर्धात्मकता टिकवून ठेवणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि इतर नवीन तंत्रज्ञानामुळे बाजारात बरेच बदल होताहेत.

टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि टाटा डिजिटल हे समूहातील पहिल्या दहा व्यवसायांमध्ये आहेत. आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत उत्पन्नाच्या बाबतीत समूहातील पहिल्या पाच कंपन्यांमध्ये स्थान मिळविणं आणि नफा कमविणं हे नव्या व्यवसायांचे उद्दिष्ट आहे, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आता नव्या व्यवसायाच्या प्रगतीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Tata Sons will invest Rs 30000 crore in these businesses which are the businesses what will be the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.