चंद्रकांत दडस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ग्राहकांचे समाधान हा बँकिंगचा पाया असताना भारतीय रिझर्व्ह बँकेकडे ग्राहकांच्या तक्रारींचा ओघ झपाट्याने वाढला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये तब्बल १३,३४,२४४ तक्रारी ग्राहकांनी बँकांबाबाबत आरबीआयकडे केल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत ही १३.५५ टक्के वाढ आहे. मुख्यत: कर्जव्यवहार व क्रेडिट कार्डशी संबंधित तक्रारी या सर्वाधिक असल्याचे आरबीआयच्या अहवालातून समोर आले.
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
अहवालानुसार, मुंबई–पुण्यात डिजिटल फसवणूक व क्रेडिट कार्डबाबत तक्रारी वाढल्या आहेत. आरबीआयकडे लहान फायनान्स बँकांविरुद्धच्या तक्रारींमध्ये ४२% टक्के वाढ झाली आहे. कर्ज व थकबाकी वसुलीबाबत २९.२५ टक्के लोकांनी तक्रार केल्या आहेत.
कारण तक्रारी टक्के
कर्ज ८६,६७० २९.२५%
क्रेडिट कार्ड ५०,८११ १७.१५%
मोबाइल बँकिंग ४९,९५१ १६.८६%
ठेव खाती ४९,९१३ १६.८४%
एटीएम/डेबिट कार्ड १८,०८२ ६.१०%
पैसे पाठवणे ३,७०२ १.२५%
पॅरा-बँकिंग ३,३२२ १.१२%
पेन्शन संबंधित २,७१९ ०.९२%
नोटा आणि नाणी ३९१ ०.१३%
इतर उत्पादने ३०,७६० १०.३८%
कोणत्या बँकांविरोधात तक्रारी?
बँकांचा प्रकार २०२४-२५ वाटा %
सार्वजनिक बँका १,०३,११७ ३४%
खासगी बँका १,११,१९९ ३७.५३%
पेमेंट बँका ७,३९५ २.५०%
लहान वित्त बँका ५,६५० १.९१%
प्रादेशिक ग्रामीण बँका ३,०१३ १.०२%
नागरी सहकारी बँका ३,३६९ १.१४%
