Pensio Scheme News: केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता युनिफाइड पेन्शन स्कीममध्ये (UPS) समाविष्ट असलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत (OPS) निवृत्ती आणि डेथ ग्रॅच्युइटी लाभ मिळणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी ही माहिती दिली. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळणारे. निवृत्तीनंतर त्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित वाटेल. कार्मिक, लोक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाने गेल्या ११ वर्षांत अनेक सुधारणा केल्या आहेत.
यूपीएस ही केंद्र सरकारने नुकतीच (१ एप्रिल २०२५ पासून) लागू केलेली नवीन पेन्शन योजना आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन मिळावी हा यामागचा उद्देश आहे. ही योजना राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या (NPS) चौकटीत आणण्यात आली आहे. एनपीएस आणि ओल्ड पेन्शन स्कीम (OPS) या दोन्हींचे काही सामायिक फायदे एकत्र करून ही योजना तयार करण्यात आलीये. दरम्यान, यूपीएसमध्ये सामील असलेले केंद्रीय कर्मचारी आता केंद्रीय नागरी सेवा (नॅशनल पेन्शन सिस्टम अंतर्गत ग्रॅच्युइटीचा भरणा) नियम, २०२१ अंतर्गत निवृत्ती आणि मृत्यू ग्रॅच्युइटीसाठी पात्र असतील. यानंतर, यूपीएसमध्ये सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांना २५ लाख रुपयांपर्यंत ग्रॅच्युइटीचा लाभ मिळू शकेल, असं सिंह म्हणाले.
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
कर्मचाऱ्यांची मागणी केली पूर्ण
कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, सरकार कर्मचाऱ्यांची एक महत्त्वाची मागणी पूर्ण करत आहे. यामुळे सेवानिवृत्तीच्या लाभांमध्ये समानता येईल. एनपीएस अंतर्गत सर्व कर्मचार् यांना सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब हा नवीन नियम दर्शवितो, असेही ते म्हणाले.
कार्मिक, लोकतक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या गेल्या ११ वर्षांच्या कामगिरीवर आयोजित पत्रकार परिषदेदर्यान जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. शासन सुलभ करण्यासाठी, लोकांना सक्षम करण्यासाठी आणि प्रशासनाचे मानवीकरण करण्यासाठी सरकारनं अनेक बदल केले आहेत. यूपीएसअंतर्गत समाविष्ट केंद्रीय सरकारी कर्मचारी आता केंद्रीय नागरी सेवा (एनपीएस अंतर्गत ग्रॅच्युइटी भरणे) नियम, २०२१ नुसार निवृत्ती आणि डेथ ग्रॅच्युईटी लाभासाठी पात्र असतील. म्हणजेच आता या कर्मचाऱ्यांनाही जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच ग्रॅच्युईटी मिळणार आहे.
ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉइज फेडरेशनचे अध्यक्ष मनजितसिंग पटेल यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं. सरकारनं उचललेलं हे ऐतिहासिक आणि अत्यंत आवश्यक पाऊल असल्याचं त्यांनी सांगितलं.