जून महिन्यापासून अनेक बँकांनी मिनिमम बॅलन्स न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून भरमसाठ दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एक बँक अशीही आहे जी आपल्या ग्राहकांना या टेन्शनमधून मुक्त करत आहे. कॅनरा बँकेनं यासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. आता बँकेची सर्व प्रकारची बचत खाती, मग ती रेग्युलर, सॅलरी अकाउंट असो किंवा एनआरआय अकाऊंट असो, त्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची चिंता राहणार नाही. कॅनरा बँकेनं मिनिमम बॅलन्सची अट काढण्याचा निर्णय घेतलाय.
कॅनरा बँकेच्या ग्राहकांनाही इतर बँकांच्या ग्राहकांप्रमाणे त्यांच्या खात्याचा प्रकार आणि शाखेचं स्थान म्हणजेच शहरी किंवा निमशहरी किंवा ग्रामीण याआधारे किमान शिल्लक ठेवणं आवश्यक होतं. यापूर्वी शहरी आणि मेट्रो शाखांमध्ये २००० रुपये, निमशहरी शाखांमध्ये १००० रुपये आणि ग्रामीण भागात ५०० रुपये किमान शिल्लक ठेवणं बंधनकारक होते. जे ग्राहक मिनिमम बॅलन्स ठेवू शकत नव्हते त्यांना दंड भरावा लागत होता. पण आता कॅनरा बँकेच्या नव्या घोषणेनंतर ग्राहकांची झिरो बॅलन्स होऊन दंड लागण्याची भीती संपणार आे त्यांच्या खात्यात झिरो बॅलन्स असला तरी त्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही.
Leela Hotels IPO ची सुस्त सुरुवात; लिस्टिंगनंतर शेअर्समध्ये मोठी तेजी
बँकेचा नवा नियम
१ जून २०२५ नंतर सर्व बचत खातेधारकांना मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही. हा लाभ सर्व बचत खात्यांवर दिला जात आहे, असं कॅनरा बँकेनं आपल्या निवेदनात म्हटलंय. या नव्या नियमाचा फायदा बँकेच्या सर्व प्रकारच्या ग्राहकांना होणार
मिनिमम बॅलन्सच्या नियमामागचा उद्देश
बँकेचा हा निर्णय ग्राहकांचा विचार करून घेण्यात आला आहे. ज्यामध्ये ग्राहकांना आपल्या कष्टानं कमावलेले पैसे अधिक मोकळेपणानं मॅनेज करण्याचा फायदा मिळतो. स्टेट बँक ऑफ इंडियानं २०२० मध्ये बचत खात्यांवरील मिनिमम बॅलन्सची अट काढून टाकली होती. आता कॅनरा बँक सर्व प्रकारच्या बचत खात्यांसाठी मिनिमम बॅलन्सची अट काढून टाकणारी पहिली मोठी सरकारी बँक ठरली आहे.