कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून पावसाने झोडपून काढले असून, गगनबावड्यासह पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे.
राधानगरी धरणातून प्रतिसेकंद २५०० घनफूट पाण्याचा विसर्ग कायम आहे. त्यात जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात सात फुटांनी वाढली असून, तब्बल १२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे.
गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, कागल, भुदरगड तालुक्यांत जोरदार पाऊस झाला आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. नद्यांच्या पातळीत वाढ होत असून, सोमवारी सकाळी आठ वाजता 'पंचगंगे'ची पातळी १३ फुटांवर होती.
सायंकाळी पाच वाजता २० फुटांवर पोहोचली. दरम्यान, आज, मंगळवारीही कोल्हापूर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने 'ऑरेंज अलर्ट' दिला आहे.
१९ सर्कलमध्ये ढगफुटीचंदगड, आजरा, कागल, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी व गगनबावडा तालुक्यांतील १९ सर्कलमध्ये चोवीस तासांत ढगफुटीसारखा पाऊस झाला. २५०० घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग राधानगरी धरणातून कायम आहे. जोरदार पाऊस पडत असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे.
जिल्ह्यात सर्वच धरणक्षेत्रात चोवीस तासांत धुवाधार पाऊस झाला आहे.२२५ मि.मी. घटप्रभा धरणक्षेत्र२०६ मि.मी. कुंभी व पाटगावमध्ये१७२ मि.मी. राधानगरी धरणक्षेत्र१४३ मि.मी. कासारी परिसरात
अधिक वाचा: दोन्ही समुद्रात तयार झाली चक्रीय स्थिती; राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता