सातारा : गेल्या आठ-दहा दिवसांपासून धुवाधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारी थोडा कमी आला. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात १६.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मे महिन्यातील सलग आठ दिवसांच्या पावसामुळे धरणातही पाण्याची आवक झाली आहे.
कोयना धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा १९.१९० टीएमसी आहे तर गतवर्षीच्या २७ मे रोजी १६.३४ इतका साठा होता. गतवर्षी आटलेले आंधळी धरण मे महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले आहे.
राज्यासह सातारा जिल्ह्याला मे महिन्यात वळिवाने झोडपले असून आज अखेर २८०.३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. यामध्ये दि. २२ ते २६ अखेर पावसाचा जोर सर्वाधिक होता.
मात्र, दि.२७ रोजी १६.२ इतकी पावसाची नोंद झाली. यामध्ये जावली व कोरेगावात जास्त पाऊस झाला. गेल्या २४ तासात सातारा १९.७, जावली २४.७, पाटण ८.८, कऱ्हाड ११.१, कोरेगाव २५.६ अशी पावसाची नोंद आहे.
धरणातील उपयुक्त साठा (टीएमसी)
मोठे प्रकल्प
धोम - २.८२०
धोम बलकवडी - ०.६२०
कण्हेर - ३.३१०
उरमोडी - ३.५२०
तारळी - १.३००
मध्यम प्रकल्प
येरळवाडी - ०.६९२
नेर - ०.४१६
राणंद - ०.२२७
आंधळी - ०.२६२
नागेवाडी - ०.०७४
मोरणा - ०.५३१
उत्तरमांड - ०.३६१
महू - ०.२९०
हातगेघर - ०.०६५
वांग (मराठवाडी) ०.९३०
अधिक वाचा: नीरा अन् भीमा खोऱ्यांत पावसाचा धुमाकूळ; मागील २४ तासांत उजनी धरणात आले किती पाणी?