Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > पुढील १५ दिवस सातत्याने सोडले जाणार इसापूर धरणाचे पाणी; रब्बी पिकांसह फळबागांना मिळणार जीवदान

पुढील १५ दिवस सातत्याने सोडले जाणार इसापूर धरणाचे पाणी; रब्बी पिकांसह फळबागांना मिळणार जीवदान

Water from Isapur dam to be released continuously for next 15 days; Rabi crops and orchards will get lifeline | पुढील १५ दिवस सातत्याने सोडले जाणार इसापूर धरणाचे पाणी; रब्बी पिकांसह फळबागांना मिळणार जीवदान

पुढील १५ दिवस सातत्याने सोडले जाणार इसापूर धरणाचे पाणी; रब्बी पिकांसह फळबागांना मिळणार जीवदान

उमरखेड तालुक्यातील शेतीसाठी महत्त्वाचे मानले जाणारे इसापूर धरणाचे पाणी अखेर कालव्याद्वारे सोडण्यात आले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना जीवदान मिळणार आहे. 

उमरखेड तालुक्यातील शेतीसाठी महत्त्वाचे मानले जाणारे इसापूर धरणाचे पाणी अखेर कालव्याद्वारे सोडण्यात आले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना जीवदान मिळणार आहे. 

यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील शेतीसाठी महत्त्वाचे मानले जाणारे इसापूर धरणाचेपाणी अखेर कालव्याद्वारे सोडण्यात आले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना जीवदान मिळणार आहे. 

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कॅनॉलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कालव्याची दुरुस्ती करणे अनिवार्य असल्याने पाणी सोडण्यास काहीसा विलंब झाला.

विशेष म्हणजे नाम फाउंडेशनच्या सहकार्याने कालव्यातील गाळ काढून तुटलेल्या भागाची दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीनंतर पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला. १५ डिसेंबर रोजी इसापूर धरणातून पाणी सोडण्यात आले. ८४ किलोमीटरचा टप्पा पार करून २३ डिसेंबर रोजी हे पाणी शेवटच्या भागात ९ क्युमेक्स वेगाने पोहोचले.

गहू, ज्वारी, हरभरा, तूर, हळद, केळी आणि इतर फळबागांसाठी पुढील १५ दिवस सातत्याने पाणी सोडले जाणार आहे, असे सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सांगितले. सुरुवातीच्या गावांना न मिळता ते शेवटच्या टोकापर्यंत मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

पाणी वितरणाचे नियोजन योग्य पद्धतीने सुरू आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळावा, यासाठी सिंचन विभाग प्रयत्नशील आहे. - अ. बा. जगताप, कार्यकारी अभियंता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प.

हेही वाचा : गणूदादा यांच्या नवीन जुगाड तंत्राने ट्रॅक्टरद्वारे पेरणी केल्यावर दांड पाडणे आता होणार सोपे

Web Title : इसापुर बांध का पानी 15 दिनों के लिए छोड़ा गया, फसलों को जीवनदान

Web Summary : इसापुर बांध से छोड़ा गया पानी 15 दिनों तक फसलों और बागों की सिंचाई करेगा। भारी बारिश के कारण हुई देरी के बाद नहर की मरम्मत, नाम फाउंडेशन की सहायता से, पानी छोड़ने में सक्षम हुई। पानी अंतिम छोर तक पहुँच गया है, वहाँ के किसानों को प्राथमिकता दी जा रही है। सिंचाई विभाग का लक्ष्य सभी किसानों को अधिकतम लाभ पहुँचाना है।

Web Title : Isapur Dam Water Released for 15 Days, Saving Crops

Web Summary : Water released from Isapur Dam will irrigate crops and orchards for 15 days. Canal repairs, aided by Naam Foundation, enabled the release after delays due to heavy rains. Water has reached the tail end, prioritizing farmers there. The irrigation department aims for maximum benefit to all farmers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.