Lokmat Agro >हवामान > Vidarbha Weather Update : रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे: विदर्भातील शेतकऱ्यांचे आभाळाकडे आशेने डोळे… वाचा सविस्तर

Vidarbha Weather Update : रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे: विदर्भातील शेतकऱ्यांचे आभाळाकडे आशेने डोळे… वाचा सविस्तर

latest news Vidarbha Weather Update: Rohini and Mriga Nakshatra Korde: Farmers in Vidarbha look to the sky with hope… Read in detail | Vidarbha Weather Update : रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे: विदर्भातील शेतकऱ्यांचे आभाळाकडे आशेने डोळे… वाचा सविस्तर

Vidarbha Weather Update : रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे: विदर्भातील शेतकऱ्यांचे आभाळाकडे आशेने डोळे… वाचा सविस्तर

Vidarbha Monsoon Update : विदर्भात मान्सूनने (Monsoon) प्रवेश केल्याचा दावा जरी करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात पावसाचे प्रमाण फारच कमी नोंदवले गेले आहे. १६ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या निम्माही पाऊस पडलेला नाही. परिणामी, खरीप पेरणीवर मोठा परिणाम झाला असून शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. (Vidarbha Monsoon Update)

Vidarbha Monsoon Update : विदर्भात मान्सूनने (Monsoon) प्रवेश केल्याचा दावा जरी करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात पावसाचे प्रमाण फारच कमी नोंदवले गेले आहे. १६ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या निम्माही पाऊस पडलेला नाही. परिणामी, खरीप पेरणीवर मोठा परिणाम झाला असून शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. (Vidarbha Monsoon Update)

शेअर :

Join us
Join usNext

नागपूर : खरीप पीक पेरणीच्या दृष्टीने मृग नक्षत्र उत्तम मानले जाते. राेहिणी नक्षत्रात (Rohini Nakshatra) फारसा पाऊस बरसला नाही. मृग (Mriga Nakshatra) संपायला पाच दिवस शिल्लक असताना हवामान प्रणाली तयार हाेत नसल्याने हे नक्षत्र देखील काेरडेच जात आहे. (Vidarbha Monsoon Update)

यावर्षी मान्सून अद्यापही सर्वदूर सक्रिय झाला नाही. पावसाअभावी पेरणी खाेळंबल्याने शेतकऱ्यांचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. मूग, उडीद व बरबटी ही पिके पेरणीचा काळ निघून गेला आहे.(Vidarbha Monsoon Update)

यावर्षी मान्सून २४ मे राेजी केरळ व तामिळनाडू आणि राेहिणी नक्षत्र सुरू हाेताच २५ मे राेजी महाराष्ट्रात दाखल झाला. सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने तसेच ढगाळ वातावरण त्याला दुजाेरा देत असल्याने विदर्भातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या हाेत्या. (Vidarbha Monsoon Update)

पेरणीसाठी शेतकऱ्यांनी बियाण्यांसह खते व इतर कृषी निविष्ठांचीही जुळवाजुळव केली. विदर्भातील काेणत्याही जिल्ह्यात पेरणीयाेग्य म्हणजे ७५ ते १०० मिमी पाऊस झाला नाही.

यवतमाळ जिल्ह्यात पुरेसा पाऊस न हाेताही काही भागात आठवडाभरापासून पेरणीला सुरुवात झाली असून, जवळपास ६३ हजार हेक्टरमध्ये पेरणी आटाेपली आहे. 

अकाेला, वाशिम, बुलढाणा व अमरावती जिल्ह्यातील तुरळक गावांमध्ये शेतकऱ्यांनी साेमवार (दि. १६) पासून पेरणीला सुरुवात केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात २३ हजार हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली असून, नागपूर, चंद्रपूर, गडचिराेली, भंडारा व वर्धा जिल्ह्यात काही गावांमध्ये माेजक्याच शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणीला सुरुवात केली आहे.(Vidarbha Monsoon Update)

धान

नागपूर विभागात सरासरी ७ लाख ९८ हजार ४२६ हेक्टरमध्ये तर अमरावती विभागात ५ हजार ९१७ हेक्टरमध्ये दरवर्षी धानाची राेवणी केली जाते. बहुतांश शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले असून, राेवणीला मात्र सुरुवात केलेली नाही.

कापूस

नागपूर विभागात सरासरी ५ लाख ८६ हजार ८३० हेक्टरमध्ये तर अमरावती विभागात १० लाख ९२ हजार ६१० हेक्टरमध्ये कापसाची लागवड केली जाते. यवतमाळ जिल्ह्यात कापसाच्या लागवडीला आठवडाभरापूर्वी सुरुवात झाली असून, अमरावती, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात पेरणीला सुरुवात झाली आहे. याचे प्रमाणही अत्यल्प आहे.

साेयाबीन

नागपूर विभागात सरासरी ३ लाख १४ हजार ४२४ हेक्टरमध्ये तर अमरावती विभागात १४ लाख ६३ हजार ४११ हेक्टरमध्ये साेयाबीनची पेरणी केली जाते. या दाेन्ही विभागातील काही गावे वगळता शेतकऱ्यांनी साेयाबीनची पेरणी केली नाही.

तूर

नागपूर विभागात सरासरी १ लाख ८० हजार २२४ हेक्टर तर अमरावती विभागात ४ लाख ४९ हजार ६७६ हेक्टरमध्ये तुरीची पेरणी केली जाते. यवतमाळ व वर्धा जिल्ह्यातील काही गावांमधील शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी केली आहे.

पेरणीत यवतमाळ आघाडीवर

विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील यवतमाळ जिल्ह्याने सध्या पेरणीत आघाडी घेतली आहे. या जिल्ह्यात धूळ पेरणीची पद्धती असून, काही शेतकऱ्यांनी अत्यल्प पावसावर पेरणीला सुरुवात केली आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात साेमवारपर्यंत ४४ हजार ३९२ हेक्टरमध्ये कापूस, ११ हजार ९८५ हेक्टरमध्ये साेयाबीन, ७ हजार ५८८ हेक्टरमध्ये तुरीची पेरणी केली आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

पावसात बुलढाणा आघाडीवर तर गाेंदिया पिछाडीवर

गाेंदिया जिल्ह्यातील १ ते १६ जून दरम्यानची पावसाची सरासरी १०२ मिमी असली तर या काळात जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे १२.८ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. या काळात सर्वाधिक म्हणजे ३१ मिमी पावसाची नाेंद बुलढाणा जिल्ह्यात झाली. या जिल्ह्याची पावसाची सरासरी ही ७४.३ मिमी आहे.

पाऊस विखुरलेलाच

मान्सूनचा सार्वत्रिक पाऊस सशक्त हवामान प्रणालीवर अवलंबून असताे. मागील आठवड्यात अंदाज घेतला १६ जूनपासून विदर्भात मान्सून सक्रिय हाेऊन सर्वदूर पाऊस बरसेल, अशी हवामान प्रणाली तयार झाली हाेती. 

मात्र, दाेन दिवसांपूर्वी या प्रणालीत पुन्हा बदल झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पुढील आठवड्यात पाऊस विखुरलेलाच असेल. पेरणीयाेग्य पाऊस हाेण्याची शक्यता खूपच कमी आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली.

जिल्हानिहाय पाऊस (मिमी)

जिल्हासरासरी पाऊसझालेला पाऊस
अकाेला७३.०२३.०
वाशिम८८.७३०.५
बुलढाणा७४.३३१.०
अमरावती७७.७२७.१
यवतमाळ८७.४२६.७
नागपूर८८.७१४.७
वर्धा९२.९१४.५
चंद्रपूर९७.९२९.१
गडचिराेली११२.५३०.८
भंडारा१०१.०१५.९
गाेंदिया१०२.०१२.८

(सर्व आकडे साेमवार, दि. १६ जूनपर्यंतचे आहेत.)

हे ही वाचा सविस्तर : Vidarbha Monsoon Update : विदर्भात उकाड्याची लाट; 'या' तारखेनंतरच पावसाची शक्यता वाचा सविस्तर

Web Title: latest news Vidarbha Weather Update: Rohini and Mriga Nakshatra Korde: Farmers in Vidarbha look to the sky with hope… Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.