Join us

Maharashtra Weather Update : यलो अलर्ट! 'या' ६ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांचा इशारा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 09:20 IST

Maharashtra Weather Update : राज्यात लवकर दाखल झालेल्या मान्सूनने (Monsoon) सुरुवातीला जोरदार हजेरी लावली. मात्र, आता पावसाचा जोर ओसरतोय. काही जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर काही ठिकाणी पेरण्या थांबवण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. जाणून घेऊन यात हवामान अंदाज सविस्तर. (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात लवकर दाखल झालेल्या मान्सूनने (Monsoon) सुरुवातीला जोरदार हजेरी लावली. मात्र, आता पावसाचा जोर ओसरतोय. काही जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे  तर काही ठिकाणी पेरण्या थांबवण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. (Maharashtra Weather Update)

राज्यात यंदा मान्सून (Monsoon) वेळेआधी दाखल झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच पावसाचा जोर अनुभवायला मिळाला. मात्र, आता हवामान खात्याने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार , राज्यात मान्सूनची तीव्रता कमी होणार असून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण नाही. मात्र, १२ जूननंतर संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विदर्भात यलो अलर्ट

आज (३१ मे) रोजी विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने 'यलो अलर्ट' जारी केला आहे. तेथील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उर्वरित राज्यात हलक्या सरींचा अंदाज

राज्यातील इतर भागांत काही ठिकाणीच हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या विस्तारित अंदाजानुसार, १ ते ५ जून दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणार आहे.

१२ जूननंतर पुन्हा सक्रिय होणार मान्सून

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण नाही. मात्र, १२ जूननंतर संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्ला 

* हवामान परिस्थिती लक्षात घेता, कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. 

* जमिनीत अद्याप पावसाचा वापसा पुरेसा नसल्यामुळे, पेरणी केल्यास बीज व खतांचा अपव्यय होण्याची शक्यता आहे. 

* पूर्व मशागतीची कामे पूर्ण करून ठेवावीत, असा सल्ला देण्यात आला आहे. 

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : मान्सूनमध्ये विश्रांतीची संधी! शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रविदर्भमराठवाडाकोकणपाऊसमोसमी पावसाचा अंदाजमोसमी पाऊस