Maharashtra Weather Update : राज्यात पावसाची सक्रियता पुन्हा वाढली असून अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. (Maharashtra Weather Update)
आज, (२१ सप्टेंबर) रोजी राज्यातील काही जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update)
मराठवाड्यात यलो अलर्ट
मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा तडाखा सुरू असून आज पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.
जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव येथे विजांचा कडकडाट, ३०–४० किमी वेगाने वारे, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मराठवाड्यात २४ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहू शकतो.
कोकण व मुंबई परिसर
मुंबई शहर व उपनगरांमध्ये आज आकाश ढगाळ राहील. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना यलो अलर्ट.
ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग येथे विजांसह वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे, सोलापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट.
पुण्याचा घाटमाथा, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे दुपारी किंवा संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊ शकतो.
उत्तर महाराष्ट्र
नाशिक, अहमदनगर येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नाशिकचा घाट भाग, धुळे, नंदुरबार, जळगाव येथे विजांच्या गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे.
विदर्भात पावसाचा जोर
विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीसह संपूर्ण विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा, विदर्भासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज व पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील. नागरिकांनी व शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.
शेतकऱ्यांना सल्ला
सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
* शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करावे.
* शेतात पाणी साचू नये यासाठी निचरा व्यवस्थेची काळजी घ्यावी.
* वादळी वाऱ्यांपासून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.