टेंभुर्णी : उजनी धरणाचीपाणीपातळी बुधवार, दि. २८ रोजी सायंकाळी ६ वाजता १३ टक्क्यांपर्यंत गेली असून, दौंड येथील विसर्गात मोठी घट झाली आहे.
२३ हजार ५०१ क्युसेक विसर्ग दौंड येथून सुरू होता. बुधवारी सकाळी ३४ हजार ८८३ क्युसेक विसर्ग होता. यामुळे ७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
गेल्या २४ तासांत ५ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे उजनी धरणाच्या इतिहासात प्रथमच मे महिन्यात २० टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.
सध्या उजनी धरणात एकूण ७०.५९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. १८ मे रोजी उजनी धरणाची पाणीपातळी वजा २२.९६ टक्क्यांपर्यंत खाली गेली होती; तर ५१.३५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता.
१४ मेपासून उजनी धरण परिसरात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला; तर १८ मेपासून अतिवृष्टी झाल्याने धरणात पाण्याची वाढ वेगाने झाली.
गेल्या १० दिवसांत ३६ टक्के पाणीपातळी वाढली आहे. सध्या पाऊस कमी झाला असला तरी दौंड येथील विसर्गामुळे उजनी धरणाची वाटचाल हळूहळू ५० टक्क्यांपर्यत जाणार आहे.
पाच दिवसांपासून दौंडमधून विसर्गरविवारी सायंकाळी दौंड येथून १० हजार क्युसेक विसर्ग येण्यास सुरुवात झाली होती. गेल्या पाच दिवसांपासून दौंड येथील विसर्ग सुरू आहे. भीमा-सीना जोड कालव्यातून १२० क्युसेक विसर्ग उजनीतून सोडण्यात येत आहे. मंगळवारी १६ मिलिमीटर पावसाची नोंद उजनी परिसरात झाली असून, गेल्या १ मेपासून ८३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
२४ तासात वाढला ५ टीएमसी पाणीसाठागेल्या २४ तासांत ५ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे उजनी धरणाच्या इतिहासात प्रथमच मे महिन्यात २० टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.
अधिक वाचा: राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे योजनेच्या निकषांत झाले बदल; जाणून घ्या सविस्तर