मराठवाड्यातील बीड तालुक्यातील बिंदुसरा धरण मध्य प्रकल्पाची निर्मिती १९५६ साली झाली होती. तेव्हापासून कधीच में महिन्यात बिंदुसरा भरले नव्हते.
इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यात वेळोवेळी झालेल्या पावसाने बिंदुसरा धरण शुक्रवारी तुटुंब भरले, यामुळे परिसरातील शेतकरी व बीड शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच मागच्या काही दिवसात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील १४३ धरणांतील पाणी पातळी वाढू लागली आहे.
मे महिन्याच्या शेवटी जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात होते त त्यानंतर पुढील चार महिन्यात वेळोवेळी पाऊस होतात असा आजवरचा अनुभव क्योवृद्ध नागरिकांना आहे. परंतु यंदा परिस्थिती वेगळी झाल्याचे पहावयास मिळत आहे. जानेवारी ते मार्च २०२७ या कालावधी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली होती.
परिणामी मे महिन्याच्या सुरुवातीपासून तीन तालुक्यातील ४१ गाव-वाड्यांना २६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली होती. जवळपास ५ मेपासून जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अठकाळी पाऊस बरसल्याने अनेक भागातील पाणीटंचाई परिस्थिती आटोक्यात आली.
परिणामी ग्रामीण भागात पाणीप्रश्न फारसा निर्माण झाला नाही. मे महिन्यात नियमित झालेल्या पावसामुळे बीड तालुक्यातील बिंदुसरा धरण सध्या तुटुंब भरून वाहू लागले आहे. यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे
पर्यटकांची गर्दी
बिदुसरा धरण भरुल्याची माहिती सोशल मीडियावरून बीड शहरासह परिसरातील लोकांना झाली. त्यानंतर तरुणांसह काही कुटुबांनी शुक्रवारी सकाळीच बिंदुसरा धरणाकडे धाव घेतली. सकाळी १० वाजता या ठिकाणी गर्दी पाहावयास मिळाली. तसेच चहा, वडापाव, चने-फुटाणे, मका आदी खाद्यपदार्थाचे हातगाडेही असल्याचे दिसून आले. प्रशासनाने या ठिकाणीही गर्दी पाहता सुरवीसाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत आहे. बिंदुसरा धरण पूर्णता भरले आहे. इतर नद्या-नालेसुद्धा वाहतील. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, काही मदत लागल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. - विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी, बीड.
हेही वाचा : आधुनिक पीक पद्धतींना सेंद्रिय जोड देत फळ शेतीत गोविंदरावांनी साधली किमया भारी