Lokmat Agro >हवामान > पन्नास वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जायकवाडीतून ३ लाख क्युसेकचा विसर्ग; १८९ मंडळांतर्गत ३८०० गावांना अतिवृष्टीचा फटका

पन्नास वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जायकवाडीतून ३ लाख क्युसेकचा विसर्ग; १८९ मंडळांतर्गत ३८०० गावांना अतिवृष्टीचा फटका

For the first time in its fifty-year history, 3 lakh cusecs of water was discharged from Jayakwadi; 3800 villages under 189 mandals were affected by heavy rains | पन्नास वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जायकवाडीतून ३ लाख क्युसेकचा विसर्ग; १८९ मंडळांतर्गत ३८०० गावांना अतिवृष्टीचा फटका

पन्नास वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जायकवाडीतून ३ लाख क्युसेकचा विसर्ग; १८९ मंडळांतर्गत ३८०० गावांना अतिवृष्टीचा फटका

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पूरपरिस्थीने दाणादाण उडविली. अतिवृष्टी आणि नाशिक जिल्हयांतील धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदी गोदावरीला महारौद्ररुप धारण केले आहे. खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर सुरु आहे.

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पूरपरिस्थीने दाणादाण उडविली. अतिवृष्टी आणि नाशिक जिल्हयांतील धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदी गोदावरीला महारौद्ररुप धारण केले आहे. खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर सुरु आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पूरपरिस्थीने दाणादाण उडविली. अतिवृष्टी आणि नाशिक जिल्हयांतील धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदी गोदावरीला महारौद्ररुप धारण केले आहे. खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर सुरु आहे. गोदावरीच्या महापुरामुळे पैठण शहरात तब्बल १९ वर्षानंतर पाणी घुसले आहे. जायकवाडी धरणांतून रात्री ११ वाजेच्या सुमारास तीन लाख सहा हजार क्युसेक इतका पाण्याचा प्रचंड विसर्ग करण्यात येत आहे.

धरण बांधल्यानंतर पहिल्यांदाच इतका विसर्ग झाला असून ही ऐतिहासिक घटना आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या जोरदार पावसाने मराठवाड्यात विविध नद्यांना आलेल्या पुरामुळे पुन्हा अनेक गावांचा संपर्क तुटला असून वस्त्या शिवारं जलमय झाली आहेत. शिवाय मराठवाड्यातील सर्व मोठ्या धरणांतून विसर्ग सुरु आहे.

मराठवाड्यात शनिवारी रात्रीतून विभागात १८९ मंडळांतर्गत येणाऱ्या ३८०० गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, लातूर, बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर मध्ये तूफान पाऊस झाला. सप्टेंबरमधील २८ दिवसांत विभागात ३६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी दिवस व रात्रीतून २८ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत विभागात एकूण ५५ मिलीमीटर पावसाची नोंद आहे. 

यात सर्वाधिक पाऊस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११० मिमी कोसळला. या पाठोपाठ जालना ६२, बीड ६३, लातूर २५, धाराशिव ३९, नांदेड २६, परभणी ४४ तर हिंगोली जिल्ह्यात ५५ मिमी पाऊस रविवारी सकाळपर्यंत झाला. परभणी जिल्हयावर सलग तीन दिवसांपासून आभाळ कोसळत आहे. 

कधी कधी केला १ लाखापेक्षा जास्त विसर्ग ?

१९७६ - १ लाख ५० हजार
१९८० - १ लाख ३० हजार
१९९४ - १ लाख १६ हजार
२००६ - २ लाख ५० हजार
२००८ - १ लाख ५४ हजार
२०२२ - १ लाख १३ हजार
२०२५ - ३ लाख ६ हजार

हेही वाचा : शेतीची वाट निवडली अन् एका रात्रीत उद्ध्वस्त झाली स्वप्नांची दुनिया; करंजीतील तरुण शेतकऱ्याचे हृदयद्रावक वास्तव

Web Title : जायकवाड़ी बांध से रिकॉर्ड 3 लाख क्यूसेक पानी छोड़ा गया; मराठवाड़ा प्रभावित

Web Summary : जायकवाड़ी बांध से रिकॉर्ड 3 लाख क्यूसेक पानी छोड़े जाने से मराठवाड़ा में गंभीर बाढ़। नासिक से भारी बारिश और बांधों से पानी छोड़े जाने से गोदावरी नदी में उफान, 3800 गांव प्रभावित। क्षेत्र में भारी वर्षा के साथ निकासी जारी।

Web Title : Jaikwadi Dam Discharges Record 3 Lakh Cusecs; Marathwada Hit Hard

Web Summary : Marathwada faces severe flooding as Jaikwadi Dam releases a record 3 lakh cusecs. Heavy rains and dam discharges from Nashik caused the Godavari River to swell, impacting 3800 villages. Evacuations are underway with significant rainfall recorded across the region.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.