Lokmat Agro >हवामान > संततधार पावसाने सांगली जिल्ह्याला दिलासा; कोयना आणि वारणा (चांदोली) धरणात पुरेसा पाणीसाठा

संततधार पावसाने सांगली जिल्ह्याला दिलासा; कोयना आणि वारणा (चांदोली) धरणात पुरेसा पाणीसाठा

Continuous rains bring relief to Sangli district; Sufficient water storage in Koyna and Warna (Chandoli) dams | संततधार पावसाने सांगली जिल्ह्याला दिलासा; कोयना आणि वारणा (चांदोली) धरणात पुरेसा पाणीसाठा

संततधार पावसाने सांगली जिल्ह्याला दिलासा; कोयना आणि वारणा (चांदोली) धरणात पुरेसा पाणीसाठा

संततधार पावसाने सांगली जिल्ह्याला दिलासा मिळाला असून, जुलैअखेरपर्यंत जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि शेतीची उन्हाळ्यापर्यंतची चिंता मिटली आहे.

संततधार पावसाने सांगली जिल्ह्याला दिलासा मिळाला असून, जुलैअखेरपर्यंत जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि शेतीची उन्हाळ्यापर्यंतची चिंता मिटली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

संततधार पावसाने सांगली जिल्ह्याला दिलासा मिळाला असून, जुलैअखेरपर्यंत जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि शेतीची उन्हाळ्यापर्यंतची चिंता मिटली आहे.

पावसामुळे शहरांची तहान भागणार असून, शेतीलाही मोठा आधार मिळणार आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात झालेल्या दमदार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. जिल्ह्यात यावर्षीच्या पावसाळ्याचा अर्धा टप्पा पूर्ण झाला असून, सुरुवातीच्या काहीशा ओढीनंतर जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली.

यामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. नागरिकांना आणि विशेषतः बळीराजाला या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे.

तहान भागवणाऱ्या धरणांत समाधानकारक साठा

सांगलीला कृष्णा नदी आणि वारणा धरणांतून पाणीपुरवठा होतो. कोयना आणि वारणा (चांदोली) धरणात पुरेसा पाणीसाठा झाल्याने सांगली शहराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच चांदोली धरण ८२ टक्के भरले होते.

गतवर्षी जुलैअखेर धरणांत होता समाधानकारक साठा

गतवर्षी जुलै महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झालेला होता. ३१ जुलै २०२४ पर्यंत जिल्ह्यात सरासरी २८३.६० मिमी पाऊस झाला होता, ज्यामुळे बहुतांश प्रकल्प भरले होते.

काही प्रकल्पांत जेमतेमच जलसाठा

जिल्ह्याच्या दुष्काळी पट्टयात, विशेषतः जत आणि आटपाडी तालुक्यांतील काही लघुप्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. मे महिन्याच्या अखेरीस या भागातील प्रकल्पांमध्ये केवळ १८ टक्के पाणीसाठा होता आणि अजूनही काही प्रकल्पांमध्ये पाणीपातळी कमी आहे.

जुलै महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. बहुतांश मोठ्या प्रकल्पांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती पाहून धरणांमधून विसर्गाचा निर्णय घेतला जाईल. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे. - बाबासाहेब पाटील, उपविभागीय अभियंता, वारणा धरण व्यवस्थापन.

सरासरी ९१.९ मिमी पाऊस

• सांगली जिल्ह्यात १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत सरासरी ११७.३० मिलिमीटर पावसाची नोंद आहे. ही आकडेवारी गतवर्षीच्या तुलनेत कमी असली, तरी या पावसाने खरीप पिकांना जीवदान दिले आहे आणि पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ केली आहे.

• सांगली जिल्ह्यातील ८३ प्रकल्पांत ६७ टक्के जलसाठा २ जिल्ह्यात ५ मध्यम व ७८ लघू असे एकूण ८३ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये जुलैअखेरपर्यंत सरासरी ६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता ९३५३ दशलक्ष घनफूट आहे.

ऑगस्टपर्यंत नियंत्रित विसर्ग बंद

चांदोलीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाला असून धरणांमधून नियंत्रित विसर्ग थांबविण्यात आला आहे. जुलैअखेर कृष्णेची पाणीपातळी २५ फुटांपर्यंत पोहोचली होती. परिस्थितीनुसार ऑगस्ट महिन्यातही विसर्ग सुरू ठेवणार असल्याचे प्रशासनाने कळवले.

हेही वाचा : गाजरगवताची ॲलर्जी झाल्यास काय कराल? कशी घ्याल काळजी; जाणून घ्या सविस्तर

Web Title: Continuous rains bring relief to Sangli district; Sufficient water storage in Koyna and Warna (Chandoli) dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.