नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असून खोऱ्यातील वीर. भाटघर, निरा देवघर, गुंजवणी ने वाढ धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून खबरदारीचा उपाय म्हणून दि. २० जूनपासून वीर धरणातून नीरा नदीत २००० क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.
नीरा खोऱ्यातील भाटघर धरण क्षेत्रात २५ मिलीमीटर पाऊस पडला आहे. उपयुक्त पाणीसाठा २.१७ टीएमसी असून ९.२३ टक्के पाणीसाठा साठा आहे. नीरा देवघर धरण भागात ७७ मिलीमीटर पाऊस पडला असून धरणात १४.७४ टक्के पाणीसाठा आहे. वीर धरणात ५७.०५ टक्के पाणीसाठा आणि गुंजवणी धरणात २९.८१ टक्के पाणीसाठा आहे.
गतवर्षी १९ जून २०२४ रोजी चार धरणात ९.६८ टक्के पाणीसाठा होता. यंदा सरासरी एकूण पाणीसाठा १०.३७टीएमसी व सरासरी टक्केवारी २१.४६ टक्के एवढी आहे.
नदीकाठच्या गावांना इशारा
• पावसाचे प्रमाण पाहता विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावर असल्यास तत्काळ हलविण्यात यावी.
• तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. तरी प्रशासकीय विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निरा उजवा कालवा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा : सुगंधी वनस्पती 'गवती चहा'ची लागवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती