डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या भात संशोधन केंद्राने विकसित केलेले 'रत्नागिरी-७' हे बियाणे कोकणातील हवामानात भाताचे चांगले उत्पादन देते.
हेक्टरी ५० ते ६० क्विंटल उत्पादन मिळत असल्याने शेजारी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिह्यांमध्ये शेतकऱ्यांची या भात बियाण्यासाठी मोठी मागणी आहे. गोव्यातील शेतकऱ्यांनाही हे भात बियाणे वरदान ठरले आहे.
गोव्यात 'रत्नागिरी-७' बियाण्याची लागवड करण्याचे हे दुसरे वर्ष आहे. 'जया' बियाण्याच्या जागी शेतकरी 'रत्नागिरी-७' चा पर्याय म्हणून वापर करत आहेत.
'रत्नागिरी-७' काय आहेत वैशिष्ट्ये?◼️ मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे खरीप हंगामात ११८ ते १२५ दिवसांत तयार होते.◼️ मध्यम कालावधीची १०० ते ११० सेमी उंचीच्या रोपट्याची ही जात आहे.◼️ या जातीचे दाणे मध्यम पातळ आणि पारदर्शक असतात.◼️ अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बियाणांमध्ये रोगप्रतिकारकताही आहे.◼️ आयआर ६४ आणि पारस सोना या जातीच्या संकरातून विकसित केलेले हे बियाणे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरले आहे.◼️ दाणे पातळ आणि चविष्ट असल्याने, बाजारपेठेत मागणी चांगली आहे.◼️ कमी उंचीमुळे, वाऱ्यामुळे पिक पडण्याची शक्यता कमी असते.◼️ सुधारित वाण असल्याने, कीड आणि रोग नियंत्रणासाठी कमी रासायनिक खतांचा वापर करावा लागतो.
अधिक वाचा: तुरीचे सर्वाधिक उत्पादन देणारे टॉप तीन वाण कोणते? जाणून घ्या सविस्तर