Lokmat Agro >स्मार्ट शेती > Krushi salla: हवामानात बदल: शेतकऱ्यांनी घ्यावेत खबरदारीचे उपाय वाचा सविस्तर

Krushi salla: हवामानात बदल: शेतकऱ्यांनी घ्यावेत खबरदारीचे उपाय वाचा सविस्तर

Krushi salla: latest news Climate change: Farmers should take precautionary measures Read in detail | Krushi salla: हवामानात बदल: शेतकऱ्यांनी घ्यावेत खबरदारीचे उपाय वाचा सविस्तर

Krushi salla: हवामानात बदल: शेतकऱ्यांनी घ्यावेत खबरदारीचे उपाय वाचा सविस्तर

Krushi Salla : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, १० मेपर्यंत मराठवाडा विभागात तूरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारे ४०-६० किमी ताशी वेगाने वाहणार आहे. (Climate change) शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. (Krushi Salla)

Krushi Salla : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, १० मेपर्यंत मराठवाडा विभागात तूरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारे ४०-६० किमी ताशी वेगाने वाहणार आहे. (Climate change) शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. (Krushi Salla)

शेअर :

Join us
Join usNext

Krushi salla : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार,(Climate change) १० मेपर्यंत मराठवाडा विभागात तूरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारे ४०-६० किमी ताशी वेगाने वाहणार आहे.(Krushi Salla)

गारपिटीसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.मराठवाड्यात ८ मे ते १० मे दरम्यान वादळी वारे ४०-५० किमी ताशी वेगाने वाहतील.(Climate change) या दरम्यान हलका ते मध्यम स्वरुपात पाऊस पडणार आहे.(Krushi Salla)

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, १० मेपर्यंत मराठवाडा विभागात तूरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारे (४०-६० किमी ताशी वेगाने वाहणार आहे.) आणि गारपिटीसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची(Climate change) शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.(Krushi Salla)

मराठवाड्यात ८ मे ते १० मे दरम्यान वादळी वारे ४०-५० किमी ताशी वेगाने वाहतील. या दरम्यान हलका ते मध्यम स्वरुपात पाऊस पडणार आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार, (ईआरएफएस) मराठवाड्यात १५ मे दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय छायाचित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

संदेश : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार आज (८ मे) रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे काढणीस असलेल्या पिक, फळाची व भाजीपाला पिकाची काढणी लवकरात लवकर करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

हळद : काढणी केलेल्या हळद पिकाची उकडणे, वाळवणे व पॉलीश करणे ही कामे करून मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी.

भुईमूग पिक : उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या (मावा, तुडतुडे, फुलकीडे व पांढरी माशी) किडींना आकर्षित करण्यासाठी एकरी १० ते १२ पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचे व लाल केसाळ अळीचे समूहातील अंडी लहान अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.

उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ५% निंबोळी अर्काची किंचा ॲझाडिरेक्टिन (३० पीपीएम) ३ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी : घड लागलेल्या केळी झाडांना काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. केळी बागेस आवश्यकतेनुसार सरी वरंब्याने पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळ्यात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या केळीच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी.

आंबा : काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी करून घ्यावी. जोराच्या वादळी वाऱ्यामुळे फळगळ व फांद्या तुटल्या असल्यास पडलेली फळे व तुटलेल्या फांद्या गोळा करून विल्लेवाट लावावी. आंबा बागेत पाण्याचा ताण बसल्यामुळे फळगळ होऊ शकते, फळगळ होऊ नये म्हणून आंबा बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या आंब्याच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी.

द्राक्ष : काढणी राहिलेल्या द्राक्ष फळांची काढणी करून घ्यावी. द्राक्ष बागेतील माती मोकळी करून खत व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेमध्‍ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते.

द्राक्ष बागेची छाटणी १५ मेपर्यंत करावी. बागेची छाटणी पाऊसाचा अंदाज घेऊन पाऊस नसताना करावी.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे. नविन लागवड केलेल्या रोपांना आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन ५% + फेनप्रोपाथ्रीन १५% १० मिली किंवा डायमेथोएट ३०% १३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजार पेठेत पाठवावी.

(सौजन्‍य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर : Krushi salla : पिकांसाठी आवश्यकतेनुसार पाण्याचे व्यवस्थापन करा; वाचा कृषी सल्ला सविस्तर

Web Title: Krushi salla: latest news Climate change: Farmers should take precautionary measures Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.