Join us

Bajar Samiti : धान्य घटलं, भाज्या वाढल्या; 'या' कृषी बाजार समितीचा चेहराच बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:07 IST

Bajar Samiti : औद्योगिकीकरण, महामार्ग आणि शहरविस्तार यामुळे छत्रपती संभाजीनगरातील जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. २० वर्षांपूर्वी ज्या बाजारात लाखो क्विंटल धान्याची उलाढाल होत होती, तिथे आता फळे व भाज्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. परिणामी, स्थानिक धान्याची आवक घटली असून बाजार परराज्यांवर अवलंबून राहतोय. शेतकरीही पालेभाज्यांकडे वळत असून, नवे आर्थिक चित्र तयार होतंय. (Bajar Samiti)

प्रशांत तेलवाडकर

महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वांत मोठी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती जाधववाडीतील होय. या समितीच्या कार्यक्षेत्रात २०१ गावांचा समावेश होता. मात्र, या क्षेत्रातील सुमारे ६० गावे, वाड्या वस्त्या औद्योगिकरणात गेल्याने आता त्या शेतजमिनींवर कारखाने उभारत आहेत. (Bajar Samiti)

परिणामी, कृउबात येणाऱ्या भुसार मालाच्या आवकीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे परराज्यातून येणाऱ्या धान्यावर सर्व मदार आहे.औद्योगिकीकरण, महामार्ग आणि शहरविस्तार यामुळे छत्रपती संभाजीनगरातील जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात मोठा बदल झाला आहे.(Bajar Samiti)

२० वर्षांपूर्वी ज्या बाजारात लाखो क्विंटल धान्याची उलाढाल होत होती, तिथे आता फळे व भाज्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. परिणामी, स्थानिक धान्याची आवक घटली असून बाजार परराज्यांवर अवलंबून राहतोय. शेतकरीही पालेभाज्यांकडे वळत असून, नवे आर्थिक चित्र तयार होतंय.(Bajar Samiti)

परराज्यांतही जाताहेत भाज्या

औद्योगीकरण, महामार्गामध्ये शेतजमिनी गेल्या. लगतचे शेतकरी भाज्यांकडे वळाले. यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन वाढले. येथील विविध औद्योगिक वसाहतींजवळील शेतजमिनीत डाळिंब, मोसंबी व भाज्यांचे उत्पादन घेतले जाऊ लागले. येथून केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर परराज्यांतही भाज्या विक्रीला जाऊ लागल्या.

औद्योगीकरणाचे परिणाम

कृउबाअंतर्गत २०१ पैकी सुमारे १४१ गावे, वाड्यावस्त्यांत शेतजमीन शिल्लक राहिली आहे. येथील शेतकऱ्यांनी धान्य, कडधान्याऐवजी फळ, पालेभाज्यांच्या शेतीवर भर दिला आहे. यामुळे धान्य-कडधान्याची आवक कमी झाली. औद्योगीकरणाचा मोठा फटका कृउबातील आवकीला बसला आहे. - राधाकिसन पठाडे, सभापती, कृउबा

छत्रपती संभाजीनगर २००१ ते २०१५ पर्यंत मका उत्पादनात नंबर वन होते. २००८ यावर्षी सर्वाधिक उत्पादन झाले होते. त्या हंगामात साडेतीन लाख क्विंटल मका देशात व विदेशात कृउबा समितीतून गेला होता, पण मागील ५ वर्षात आवक घटून १५ ते २० हजार क्विंटलपर्यंत मर्यादित आहे. - कन्हैयालाल जैस्वाल, अडत व्यापारी संचालक

मागील १५ ते २० वर्षांत जिल्ह्यातील गव्हाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. गव्हाची शेती कमी झाली. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांतून येणाऱ्या गव्हावर सर्व मदार आहे. ७० टक्के गहू एकट्या मध्य प्रदेशातून येतो. - नीलेश सोमाणी, व्यापारी

कृउबा जाधववाडी : धान्य आवक घट; भाजीपाल्याची वाढ

भुसार मालाची स्थानिक आवक घट (२००१ विरुद्ध २०२४)

भुसार माल२००१ मधील आवक (क्विंटल)२०२४ मधील आवक (क्विंटल)
गहू१,१२,०००११,०३२
ज्वारी३०,१७२११,०७८
बाजरी६९,०००८,३२५
तूर५७,६१७२८,६१८

वर्षभरातील एकूण धान्य आवक (सर्व भुसार माल)

वर्षएकूण आवक (क्विंटल)
२००१३,८८,०००
२०२४१,६४,०००

भाजीपाला आवक वाढ (लोकसंख्येनुसार मागणी)

वर्षभाजीपाल्याची आवक (क्विंटल)
२००१४८,००,००० (४८ लाख)
२०२४११,२६,००,००० (११ कोटी २६ लाख)

विशेष माहिती

मुद्दामाहिती
कार्यक्षेत्रातील गावे (पूर्वी)२०१ गावे
औद्योगिकीकरणामुळे गमावलेली गावे६० गावे (कारखाने, महामार्गांमध्ये गेली)
शिल्लक शेती गावे (२०२४)१४१ गावे
मध्य प्रदेशातून येणारा गहू७०% पेक्षा अधिक
मका उत्पादन (२००८)३.५ लाख क्विंटल (देश-विदेशात विक्री)
मका उत्पादन (२०२४)१५ ते २० हजार क्विंटल
भाजीपाला निर्यातमहाराष्ट्राबरोबर परराज्यांतही विक्री

हे ही वाचा सविस्तर : बनावट सातबारा, खोटा पेरा; सोयाबीन खरेदीत तब्बल १ कोटींचा घोटाळा उघड वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीऔरंगाबादशेतकरीभाज्याफळेमका