सिंधुदुर्ग : एकीकडे आंब्याची आवक कमी झालेली असताना, दुसरीकडे फणसाची आवक मात्र वाढली आहे. फणस आता मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाला असून फणसाचा घमघमाट सुटला आहे. फणसाची गोडी चाखण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहेत.
१०० ते ५०० रुपयापर्यंत फणस विकला जात असल्याचे विक्रेत्याने सांगितले. वटपौर्णिमेनिमित्त फणसाची आवक वाढली असून या एक ते दोन दिवसात ती आणखीन वाढणार असल्याचे चित्र आहे.
बाजारात आता फणसाची आवक वाढली आहे. कापा फणस २०० रुपयाला विकला जात आहे. तर कापा फणसाचे काढलेले गरे १०० रूपये किलो दराने विकले जात आहेत. कापा फणसाला मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
२०० रूपयापर्यंत बाजारात विकला जातो कापा फणसउन्हाळ्यात आंबा, कलिंगड, द्राक्षे ही फळे खाण्याची जितकी उत्सुकता असतो, तितकीच फणसाचीही असते. गोड चव, आरोग्यदायी गुणधर्मामुळे त्याच्या मागणीमध्ये वाढ होत आहे.
वटपौर्णिमेला मोठी मागणीफणसाचे दर जून महिना उजाडल्यावर कमी झाले आहेत. याआधी दर ३०० ते ४०० रूपयांपर्यंत गेले होते. आता ते २०० रूपयांवर आले आहेत. वटपौर्णिमेला फणसाला मोठी मागणी असते.
मोठ्या प्रमाणावर मुंबई मार्केटमध्येकोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने टेम्पो किवा ट्रक भरून फणस मुंबईतील मार्केटला विक्रीसाठी जातात. यावर्षी फणसाचे उत्पादन चांगले आले असून ते आता वटपौर्णिमेच्या निमित्ताने मुंबईला जायला सुरुवात झाले आहेत.
काप्या फणसाला अधिक मागणी- कच्चा फणसासोबत पिकलेले फणसही आता मार्केटमध्ये मोठ्या संख्येने येवू लागले आहेत.- हे भाजीचे गोड फणस आकारानुसार १०० ते ४०० रूपये अशा दरात विक्री करण्यात येत आहेत.- यात कापा फणसाला अधिक मागणी आहे.- मे महिन्याच्या ऐन हंगामात पाऊस कोसळल्यामुळे त्याचा काही प्रमाणात फटका फणसाला बसला आहे.- पावसामुळे फणसाचे नुकसान झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.- पण फसणाची खरेदी सध्या जोरदार सुरू असल्याचे विक्रेते म्हणाले.
अधिक वाचा: निसर्गात ह्या पक्षांना कळते कधी येणार पाऊस? कसे लावतात अंदाज? जाणून घ्या सविस्तर?