नवी मुंबई : खराब हवामानामुळे हापूस आंब्याचा हंगाम लांबणीवर पडला आहे. अशा परिस्थितीत सोमवारी कोकणातून १०० पेट्यांची आवक झाली आहे.
होलसेल मार्केटमध्ये १५०० ते २५०० रुपये डझन दराने तर किरकोळ मार्केटमध्ये ३ ते ४ हजार रुपयांनी आंब्यांची विक्री होत आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एपीएमसी) फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून ५ ते १० पेट्यांचीच हापूसची आवक सुरू होती. सोमवारी दिवसभरात १०० पेट्यांची आवक झाली आहे.
फेब्रुवारीअखेरपर्यंत आवक वाढून १५ मार्चपासून आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे. खराब हवामानामुळे हापूस आंब्याचे नुकसान झाले आहे.
अधिक वाचा: शेतकऱ्यांच्या विरोधामुळे आजपर्यंत एक गुंठाही जमीन संपादित झाली नाही; तिसरी मुंबई कुठे होणार?
