Lokmat Agro >शेतशिवार > Vidarbha Pani Parishad : जलयुक्त शिवार ते जलदूत; विदर्भात पाण्याच्या संरक्षणासाठी उपाययोजना आवश्यक वाचा सविस्तर

Vidarbha Pani Parishad : जलयुक्त शिवार ते जलदूत; विदर्भात पाण्याच्या संरक्षणासाठी उपाययोजना आवश्यक वाचा सविस्तर

latest news Vidarbha Pani Parishad: Jalyukt Shivar to Jaldoot; Measures are needed to protect water in Vidarbha Read in detail | Vidarbha Pani Parishad : जलयुक्त शिवार ते जलदूत; विदर्भात पाण्याच्या संरक्षणासाठी उपाययोजना आवश्यक वाचा सविस्तर

Vidarbha Pani Parishad : जलयुक्त शिवार ते जलदूत; विदर्भात पाण्याच्या संरक्षणासाठी उपाययोजना आवश्यक वाचा सविस्तर

Vidarbha Pani Parishad : पाण्याच्या लढ्यासाठी आता सज्ज व्हावे लागणार आहे. जिल्ह्यांमध्येही पाण्याचा संघर्ष सुरू झाला आहे. यावर जलसंवर्धन, जलपुनर्भरण आणि पुनर्वापरच आता एकमेव उपाय असेल. पाण्याच्या सरंक्षणासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. वाचा सविस्तर (Vidarbha Pani Parishad)

Vidarbha Pani Parishad : पाण्याच्या लढ्यासाठी आता सज्ज व्हावे लागणार आहे. जिल्ह्यांमध्येही पाण्याचा संघर्ष सुरू झाला आहे. यावर जलसंवर्धन, जलपुनर्भरण आणि पुनर्वापरच आता एकमेव उपाय असेल. पाण्याच्या सरंक्षणासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. वाचा सविस्तर (Vidarbha Pani Parishad)

शेअर :

Join us
Join usNext

Vidarbha Pani Parishad : पाण्याच्या लढ्यासाठी आता सज्ज व्हावे लागणार आहे. जिल्ह्यांमध्येही पाण्याचा संघर्ष सुरू झाला आहे. यावर जलसंवर्धन, जलपुनर्भरण आणि पुनर्वापरच आता एकमेव उपाय असेल. पाण्याच्या सरंक्षणासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. (Vidarbha Pani Parishad)

पाण्याचे वॉर सुरू झाले आहेत. नाशिक, नगर, मराठवाडा यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. भविष्यात हे संघर्ष अधिक तीव्र होतील. यावरचा एकमेव उपाय म्हणजे जलसंवर्धन, जलपुनर्भरण आणि पाण्याचा पुनर्वापर, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले. (Vidarbha Pani Parishad)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जनकल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'विदर्भपाणी परिषद' वनामती सभागृहात शनिवारी पार पडली. उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. (Vidarbha Pani Parishad)

मुख्यमंत्री यांनी पुढे सांगितले की, पाण्याच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळेच विदर्भातील आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. जलयुक्त शिवार अभियानामुळे अनेक गावांमध्ये जलपातळी सुधारली असून दुष्काळाच्या झळा कमी झाल्या आहेत. परंतु हे अपुरे आहे, कारण आता जिल्ह्यांतही पाण्याचा संघर्ष तीव्र होतो आहे. (Vidarbha Pani Parishad)

विदर्भ पाणी परिषदेप्रसंगी मार्गदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केले. यावेळी मंचावर आ. परिणय फुके, कुलगुरू डॉ. माधवी खोडे, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, माफसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. 

जलदूत निर्माण करणार 

विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी जलदूत निर्माण करून विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती केली जाणार आहे. पाण्याचा शाश्वत वापर, नदी-नाल्यांचे शुद्धीकरण आणि जलसाक्षरता हे मुख्य उद्देश असतील.

जलप्रकल्प व नदीजोडीचे आश्वासन

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वैनगंगा-नळगंगा या महत्वाच्या नदीजोड प्रकल्पाबरोबरच पाच नव्या प्रकल्पांची माहिती दिली. तसेच मध्यप्रदेश सरकारसोबत तापी जलपुनर्भरण प्रकल्पाचा करार झाल्याचे सांगितले, ज्यामुळे अमरावती विभागाला २० ते २२ टीएमसी पाणी मिळेल.

फक्त उद्योग नव्हे तर प्रत्येक व्यक्ती, संस्था, शाळा, शेतकरी, ग्रामपंचायती यांनी जलधारणाचे कार्य अंगीकारले पाहिजे. नाहीतर भविष्यातील संकट मोठे आहे. विदर्भ पाणी परिषदेप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा सविस्तर : Marathawada Dam Water: 'मे'न्सून स्पेशल : मराठवाड्याचे धरण भरभरून; जाणून घ्या उपलब्ध पाणीसाठा किती?

Web Title: latest news Vidarbha Pani Parishad: Jalyukt Shivar to Jaldoot; Measures are needed to protect water in Vidarbha Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.