छत्रपती संभाजीनगर : मे महिन्यात मेघगर्जनेसह वादळी अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) मराठवाड्यात कहर केला आहे. एकीकडे खरिपाच्या तयारीला सुरूवात होत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. (Awakali Paus)
या हवामान बदलामुळे तब्बल ३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान (Crops Damaged) झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात दिसून आले आहे. (Unseasonal Rains)
यात सर्वाधिक २ हजार हेक्टर जालना जिल्ह्यात पिकांचे नुकसान (Crops Damaged) झाले असून, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी एप्रिल महिन्यातही ३ हजार ०२६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. (Unseasonal Rains)
अवकाळी पावसाचा जोर
* मे महिन्याच्या १६ दिवसांपैकी १० दिवसांहून अधिक दिवस पाऊस झाला आहे.
* विभागात १ ते १६ मे दरम्यान सरासरी १४.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
* छत्रपती संभाजीनगरसह लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, धाराशिव जिल्ह्यांत पावसाचा मोठा फटका बसला.
पशुधनाला फटका
* १ ते १६ मे दरम्यान विज पडून सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
* छत्रपती संभाजीनगर, नांदेडमध्ये प्रत्येकी २, बीडमध्ये १, लातूरमध्ये १ घटना
* विजेच्या झटक्याने २० हून अधिक जनावरे दगावली आहेत.
शेतीसह सौरऊर्जा साधनांचे नुकसान
* हिंगोली जिल्ह्यात वादळामुळे भुईमूग, भाजीपाला, फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
* सेनगाव, वसमत, औंढा नागनाथ तालुक्यांमध्ये सौरऊर्जा प्लेटचेही नुकसान झाले आहे.
पावसाचा इशारा
* 'वनामकृ' विद्यापीठाच्या हवामान विभागाने येत्या चार दिवसात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे.
* आज (१७ मे) रोजी धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी येथे पावसाचा इशारा दिला आहे.
* १८ मे रोजी धाराशिव, लातूर, बीड, जालना या जिल्हांत पावसाची शक्यता आहे.
* १९-२० मे रोजी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा सविस्तर : Unseasonal Rain: अवकाळीच्या तडाख्याने 'ही' पिके झाली जमीनदोस्त वाचा सविस्तर