राज्यात फेब्रुवारी ते मे या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या १ लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांचे नुकसान झाले होते.
त्यापोटी राज्य सरकारने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार निधीला मान्यता दिली आहे. यात पुणे जिल्ह्यातील एप्रिल व मे महिन्यात १५ हजार ३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते.
याचा फटका ४६ हजार २९ शेतकऱ्यांना बसला होता. त्यासाठी राज्य सरकारने २५ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
राज्यात फेब्रुवारी ते मे या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी विभानिहाय शेतकऱ्यांची संख्या, बाधित क्षेत्र आणि निधी खालीलप्रमाणे
विभाग | शेतकरी संख्या | बाधित क्षेत्र (हेक्टर) | मंजूर निधी (रुपये) |
छत्रपती संभाजीनगर | ६७ हजार ४६२ | ३४ हजार ५४२.४६ | ५९ कोटी ९८ लाख २० हजार |
पुणे | १ लाख ७ हजार | ४५ हजार १२८.८८ | ८१ कोटी २७ लाख २७ हजार |
नाशिक | १ लाख ५ हजार १४७ | ४५ हजार ९३५.१६ | ८५ कोटी ६७ लाख ८ हजार |
कोकण | १३ हजार ६०८ | ४ हजार ४७३.६९ | ९ कोटी ३८ लाख २४ हजार |
अमरावती | ५४ हजार ७२९ | ३६ हजार १८९.८६ | ६६ कोटी १९ लाख ११ हजार |
नागपूर | ५० हजार १९४ | २० हजार ७८३.१६ | ४ कोटी ९१ लाख ६३ हजार |
अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असून, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या निधीस तातडीने मान्यता दिली असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.
अधिक वाचा: शेतकऱ्यांचे बांधावरील वाद आता निकाली निघणार; सातबाऱ्यावरील पोटहिश्श्यासाठी 'हा' महत्वाचा निर्णय