भारताने 17 मालिकांमधल्या जिंकल्या फक्त तीन कसोटी मालिका

टी-20 सामन्यातील मालिका 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

भारताने इंग्लंडमध्ये 17 कसोटी मालिक खेळल्या आहेत. पण या 17 पैकी भारताला फक्त तीन मालिकाच जिंकत्या आल्या आहेत.

इंग्लंडमध्ये 1971 साली पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकता आली होती. अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने 1971 साली 1-0 अशी कसोटी मालिका जिंकली होती.

भारताने इंग्लंडमध्ये दुसरा मालिका विजय मिळवला होता तो 1986 साली. या संघात सुनील गावस्कर, कपिल देव या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. या दौऱ्यातील पहिले दोन सामने भारताने जिंकले होते

2007मध्ये इंग्लंडमध्ये भारताने कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर गेल्या अकरा वर्षांत भारताला इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिक जिंकता आलेली नाही.