भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील उद्या निर्णायक टी-20 सामना, पावसाचे सावट

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-22 मालिकेतील निर्णायक सामना उद्या (दि.13) हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडीयमवर रंगणार आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघाने आज सराव केला. मात्र, हैदराबादमध्ये पावसाचा लपंडाव सुरु असून, याचा परिणाम भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यावर पडू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ प्रत्येकी एक-एक सामना जिंकून मालिकेत बरोबरीवर आहेत.

अखेरचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने दोन्ही संघ उद्या मैदानात उतरतील.

यापूर्वी एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला 4-1 असा शह दिला होता. त्यामुळे याच आत्मविश्वासाच्या जोरावर टी-20 मालिका जिंकण्याचा इरादा भारतीय संघाचा आहे.