एकीकडे चीनने मुलांना पाचवीपासूनच एआय शिकवणं सुरु केलं. दुसरीकडे आपल्याकडेही पालक मुलांना लहानपणापासूनच कोडिंग आणि रोबोटिक्स शिकवतात. (Tamil Nadu government takes a step forward! Cyber training mandatory for children)पण हे सारं एकीकडे आणि दुसरीकडे मुलंही सायबर क्राइम आणि सायबर बुलिंगला बळी पडतात. सायबर जगात सावध राहून कसे वागायचे याचे प्रशिक्षण मुलांना नसते पण मुलं मात्र सतत ऑनलाइन असतात. मोबाइल गेम खेळतात, वाट्टेल ते व्हिडिओ पाहतात. म्हणजेच आता त्यांना ते साधन कसं वापरायचं हे ही शिकवायला हवं. म्हणूनच नुकताच तामिळनाडू सरकारने एक निर्णय घेतला. तामिळनाडूत आता शाळांमध्ये सायबर सुरक्षा शिक्षण सक्तीचे केले आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षिततेबद्दल जागरुक ठेवणे हा या नियमामागील हेतू आहे.
तमिळनाडू सरकारच्या 'नान मुदलवन' उपक्रमामध्ये सरकारने शिक्षकांना प्रशिक्षण घेणे सक्तीचे केले आहे. सायबर सुरक्षितता विद्यार्थांना शिकवण्यासाठी आधी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यात विद्यार्थ्यांचे संरक्षण, मानसिक आरोग्याची काळजी, कोविड सुरक्षितता आणि सायबरबुलिंग अशा विषयांबद्दल प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणासाठी विविध पद्धतींचा वापर केला जात आहे. आजकाल शाळकरी मुलांना तंत्रज्ञानाची बरीच जाण असते. त्यामुळे सायबर धोकाही त्यांना माहिती असणे गरजेचे आहे. शाळेत रोज एक तास सायबर प्रशिक्षण मुलांना दिले जाईल.
सध्या सायबर क्राइम फार वेगाने वाढत चालले आहे. त्याचा फटका सगळ्यांनाच बसतो. मात्र थोडी सावधगिरी बाळल्याने अशा चक्रांमध्ये अडकण्यापासून वाचता येईल. त्यासाठी आधी सायबर क्राइमचे प्रकार माहिती असणे गरजेचे आहे. त्याची माहिती व्हावी मुलांची आणि त्याच्या कुटुंबियांची फसवणूक होऊ नये यासाठी हे प्रशिक्षण नक्कीच फायद्याचे ठरेल असे शासनाला वाटते.
मुलांच्या हातात मोबाइल, लॅपटॉप, आहेत. ते सोशल मीडियावरही सतत कनेक्ट असतात. फ्रॉड कॉलला मोठे फसतात, पैसे गमावून बसतात. चुकीच्या लिंक ओपन करतात. मुलांना यासगळ्या ट्रॅपपासून दूर करुणं आणि सजग करणं अत्यंत गरजेचं आहे.