Join us

पावसाळ्यात लाकडी फर्निचरला बुरशी, वाळवी लागण्याची भीती? ४ टिप्स- फर्निचर टिकेल वर्षांनुवर्षे.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2025 13:37 IST

How To Take Care Of Wooden Furniture In Monsoon Season?: पावसाळ्यात लाकडी फर्निचर खराब होऊ नये म्हणून त्याची थोडी विशेष काळजी घ्यावी लागते.(how to keep wooden furniture safe from termites in rainy days?)

ठळक मुद्देफर्निचरवर माॅईश्चर जमा होऊन ते लवकर खराब होऊ शकते. घरात मोकळी हवा राहाणं खूप गरजेचं आहे.

यंदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उन्हाळा लवकर संपला आणि पावसाळ्याला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक घरांमधली उन्हाळी कामं राहून गेली. पावसाळा सुरू होण्यापुर्वी उन्हाळ्यातच अनेक घरांमध्ये घरातल्या फर्निचरची विशेष काळजी घेतली जाते. ते स्वच्छ करून त्याला पॉलिशिंग करून घेतलं जातं. जेणेकरून ते पावसाळ्यातल्या ओलसर हवेमुळे खराब होत नाही. पण यंदा तसा वेळच मिळाला नाही. त्यामुळे यंदा पावसाळ्यात लाकडी फर्निचरला बुरशी किंवा वाळवी लागण्याची भीती वाटत असेल तर हे काही उपाय करून पाहा (How To Take Care Of Wooden Furniture In Monsoon Season?). फर्निचरची चमक टिकून राहील आणि ते अजिबात खराब होणार नाही.(how to keep wooden furniture safe from termites in rainy days?)

पावसाळ्यात लाकडी फर्निचरची काळजी कशी घ्यावी?

 

१. पॉलिशिंग

घरातल्या लाकडी फर्निचरला नियमितपणे पॉलिशिंग करणं गरजेचं असतं. त्यामुळे फर्निचर जास्त दिवस टिकतं. त्याला वाळवी लागण्याची भीती नसते. बाजारात मिळणारे वुडन पॉलिशिंग आणून तुम्ही घरच्याघरीही फर्निचरला पॉलिश करू शकता.

ब्रा, स्लीपचा बेल्ट सैल झाल्याने खांद्यावरून ओघळतो? १ ट्रिक- बेल्ट होईल परफेक्ट मापाचा

२. ऑलिव्ह ऑईल

जर फर्निचरला पॉलिशिंग करणं होत नसेल तर आठवड्यातून एकदा ते ऑलिव्ह ऑईल लावून पुसा. यामुळेही फर्निचर अगदी चकाचक दिसेल शिवाय त्याच्यावर ओलसरपणा जास्त टिकून राहणार नाही.

 

३. भिंतीपासून दूर ठेवा

पावसाळ्याच्या दिवसांत घराच्या काही भिंतींमध्येही ओलावा येतो. जर तुमचं फर्निचर भिंतीला अगदी चिटकून असेल तर भिंतीच्या ओलाव्यामुळे फर्निचर खराब होण्याची भीती असते. त्यामुळे जे काही मुव्हेबल फर्निचर असेल ते नेहमी भिंतीपासून थाेडं दूर ठेवावं.

फक्त २० रुपयांची 'ही' वस्तू घरी आणा- किचनपासून बाथरुमपर्यंत सगळं घर होईल स्वच्छ- चकाचक

४. घरात मोकळी हवा ठेवा

पावसाळ्याच्या दिवसांत सगळीकडे दमट हवा असते. दमट हवेमुळे फर्निचर लवकर खराब होण्याची भीती असते. त्यामुळे पावसाळ्यात घराच्या दारं- खिडक्या नेहमी बंद ठेवू नका. दारं- खिडक्या बंद ठेवल्याने घरात जास्त दमट वाटते. त्यामुळे फर्निचरवर माॅईश्चर जमा होऊन ते लवकर खराब होऊ शकते. घरात मोकळी हवा राहाणं खूप गरजेचं आहे.

 

टॅग्स :सोशल व्हायरलमोसमी पाऊसस्वच्छता टिप्सपाऊससुंदर गृहनियोजन