Join us  

Relationship Tips : चुकीच्या माणसाशी लग्न करण्यापेक्षा उशिरा केलेलं चांगलं!- हे खरंच कारण.....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 4:40 PM

Relationship Tips : काय मग लग्न कधी करतेस? असा नातेवाईकांचा प्रश्न ठरलेला असतो. लग्न, रिलेशनशिप त्यांच्याशी निगडीत संकल्पनांना कलाटणी देणारी  ही मालिका आहे. 

ठळक मुद्देबरेच लोक असे म्हणतात की जे उशीरा लग्न करतात त्यांच्यात नक्कीच काहीतरी कमी आहे.  अशा लोकांना हे समजले पाहिजे की चुकीच्या व्यक्तीशी लवकर लग्न करण्यापेक्षा उशीरा लग्न करणे चांगले.उशीरा लग्न झाल्यावर, जोडप्यांना एकमेकांच्या जबाबदाऱ्या आणि प्राथमिकता समजतात. असे जोडपे केवळ रागानं  बोलण्यावरून होणारी भांडणं टाळत नाहीत तर त्यांच्या नात्यासाठी काय चांगले आहे हेसुद्धा त्यांना माहीत असतं.

नातेवाईक किंवा मित्र, कुटुंबातील सदस्य असो, भारतीय समाजात विशिष्ट वयानंतर लग्नाचा दबाव वाढू लागतो. आपल्या पालकांनी योग्य घरात योग्य वेळी लग्न करावे अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. लग्न करण्याचा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक असावा. पण योग्यवेळी लग्न न केल्यास घरात भांडणं, टोमणं मारणं सुरू होतं अशावेळी कधी एकदा लग्न करतोय असं ­­­वाटतं.  काय मग लग्न कधी करतेस? असा नातेवाईकांचा प्रश्न ठरलेला असतो. 

सध्या  टेलिव्हिजनवरील मालिका अजूनही बरसात आहे. ही बरीच चर्चेत आहे.  मालिका आणि मालिकेतले मीरा (मुक्ता) आणि आदिराज (उमेश) यांची प्रेमकथा प्रेक्षकांना आवडते आहे. प्रेमाला कुठे असते Expiry Date? असं म्हणत मीरा आणि आदिराज प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण करताहेत. लग्न, रिलेशनशिप त्यांच्याशी निगडीत संकल्पनांना कलाटणी देणारी  ही मालिका आहे. बरेच लोक असे म्हणतात की जे उशीरा लग्न करतात त्यांच्यात नक्कीच काहीतरी कमी आहे.  अशा लोकांना हे समजले पाहिजे की चुकीच्या व्यक्तीशी लवकर लग्न करण्यापेक्षा उशीरा लग्न करणे चांगले. या दरम्यान, आपल्याला मोकळेपणानं जीवन जगण्याची संधीच मिळत नाही तर स्वत: ला समजून घेता येतं.

उशीरा लग्न झाल्यावर, जोडप्यांना एकमेकांच्या जबाबदाऱ्या आणि प्राथमिकता समजतात. असे जोडपे केवळ रागानं  बोलण्यावरून होणारी भांडणं टाळत नाहीत तर त्यांच्या नात्यासाठी काय चांगले आहे हेसुद्धा त्यांना माहीत असतं. इतकंच नाही तर उशिरा लग्न करणार्‍यांना भावनिकदृष्ट्या स्थिर होण्याची संधी मिळते, ज्यामुळे ताण तणाव कमी होतो.

सेक्शुअल लाईफ चांगली असते

जर आपण चुकीच्या व्यक्तीशी लग्न केले तर मग वैवाहिक आयुष्यातील रस आयुष्यातून पूर्णपणे संपेल. तर एका चांगल्या जोडीदारासह आपण आपल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकता. इतकेच नाही, जे लोक मोठ्या वयात लग्न करतात तेसुद्धा तरुण लोकांपेक्षा अधिक उघडपणे त्यांच्या सेक्स लाइफबद्दल बोलतात आणि आनंद घेतात, ज्यामुळे त्यांच्या विवाहित जीवनात समतोल कायम राहतो.

नात्यात प्रामाणिकपणा कायम राहतो

जेव्हा आपण योग्य आयुष्य जोडीदाराचा शोध घेता. तेव्हा आपणबराच वेळ घेता. ज्यामुळे आम्हाला संबंधातील प्रामाणिकपणा जाणवतो. दुसरीकडे, ज्या लोकांना काही न करता चांगला साथीदार सापडतो, तेव्हा ते त्यांच्या नात्याबद्दल अजिबात गंभीर नसतात, परिणामी पती-पत्नीमध्ये संशय, भांडणं, राग आणि मत्सर वाढतो.

आर्थिक बाबींचे टेंशन फारसे नसते

जे लोक उशीरा लग्न करतात ते आर्थिकदृष्ट्या बळकट असतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या नात्यात पैशाची कमतरता भासत नाही. तर जे तरुण वयात लग्न करतात ते या काळात स्वत: ला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याचा प्रयत्न करीत असतात. वैवाहिक नात्यातील जबाबदारी यादेखील त्यांच्यावर पडण्यास सुरुवात होते, ज्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता असते. 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपलग्न